शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

ऑनलाइन एज्युकेशनने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:17 IST

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे; यामध्ये दीड ...

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे; यामध्ये दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण होत आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कमालीचे बिघडत चालले आहेत. वळणदार हस्ताक्षर येत नसून लिहिण्याची गतीही मंदावत आहे. पालकवर्गही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आली असून परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. प्रश्न-उत्तरे व गृहपाठ लिहिण्याची सवय राहली नसल्याने लेखी परीक्षेला अडचण येणार आहे.

विद्यार्थ्यांनो हे करा!

१) विद्यार्थ्यांनी नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करावा.

२) पुस्तकांमधील काही उतारे वहीमध्ये लिहिल्यास हस्ताक्षरांची गती वाढण्यास मदत होईल.

३) दररोज ऑनलाईन शिक्षणामध्ये सांगितलेले लिहून घ्यावे.

मराठी विषयांचे तज्ज म्हणतात...

मूल्यमापन लेखी परीक्षेवर होत असते. लेखी पेपर सोडविण्यासाठी लेखी सराव आवश्यक असतो. तीन तासाच्या आत पेपर सोडविण्यासाठी हा सराव गरजेचा आहे. शिक्षक व शाळांनी लेखी सराव करून घेतल्यास अडचण दूर होईल.

नीलेश पाकदुणे, शिक्षक

लिहिण्याचा सराव राहिला नाही. मोबाईलमध्ये बोलून टाईप करूनच सर्व शक्य होत आहे. मुलांना हस्तांक्षरात लेखन करणे गरजेचे वाटत नाही. त्याचा परिणाम शुद्धलेखनावर होत आहे.

स्वाती दामोदरे, शिक्षिका

ऑनलाईनमुळे लिहिण्याची सवय बिघडत चालली आहे. त्यामुळे घरीच हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. मुलांचा लेखी सराव सुरू आहे.

किशोर पाटील, पालक

ऑनलाईन अभ्यासामुळे मुले लिहिण्याचा सराव विसरले आहेत. मोबाईलवर सर्व होते. लिहिण्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेची चिंता लागली आहे.

अमोल कळंब, पालक