शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

१२ वीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज

By admin | Updated: August 18, 2015 01:27 IST

अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट.

बुलडाणा: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मार्च २0१६ मध्ये इयत्ता १२ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी विद्यार्थ्यांंना परिक्षा फॉर्म शाळेमध्ये भरून द्यावे लागत होते. यावर्षीपासून प्रथमच परिक्षा फॉर्म ऑनलाईन भरावे लागणार आहेत. अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपासून सुरूवात झाली असून, अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. अर्ज भरण्यासाठी १२ ते १५ दिवस शिल्लक असून, सोमवारी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेंवर गर्दी केली. ऑनलाईनची अडचण दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नाही., असली तरी सुरळीत राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्यासाठी तासन्तास बसावे लागते. कधी कनेक्टीव्हीटी मिळत नाही, तर कधी सर्व्हर डाउन राहते. अशा विविध अडचणींचा सामना विद्यार्थ्यांंना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी येवून अर्ज दाखल करीत आहेत. चलानाद्वारे भरावे लागणार शुल्क परीक्षेचा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शुल्क भरल्यानंतर महाविद्यालयास विद्यार्थ्यांंची यादी बोर्डाकडे सादर करावी लागणार आहे. आधार कार्डाची आवश्यकता नाही ऑनलाइन परीक्षा फॉर्ममध्ये आधार क्रमांकासाठी जागा ठेवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांंकडे आधार क्रमांक उपलब्ध आहे, त्यांनी तो भरावा; मात्र आधार क्रमांक भरणे सर्वांंना बंधनकारक नाही., असे मंडळाने स्पष्ट केले आहे. १२ वीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट. बुलडाणा: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मार्च २0१६ मध्ये इयत्ता १२ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी विद्यार्थ्यांंना परिक्षा फॉर्म शाळेमध्ये भरून द्यावे लागत होते. यावर्षीपासून प्रथमच परिक्षा फॉर्म ऑनलाईन भरावे लागणार आहेत. अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपासून सुरूवात झाली असून, अमरावती विभागासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. अर्ज भरण्यासाठी १२ ते १५ दिवस शिल्लक असून, सोमवारी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेंवर गर्दी केली. ऑनलाईनची अडचण दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नाही., असली तरी सुरळीत राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्यासाठी तासन्तास बसावे लागते. कधी कनेक्टीव्हीटी मिळत नाही, तर कधी सर्व्हर डाउन राहते. अशा विविध अडचणींचा सामना विद्यार्थ्यांंना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी येवून अर्ज दाखल करीत आहेत. चलानाद्वारे भरावे लागणार शुल्क परीक्षेचा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शुल्क भरल्यानंतर महाविद्यालयास विद्यार्थ्यांंची यादी बोर्डाकडे सादर करावी लागणार आहे. आधार कार्डाची आवश्यकता नाही ऑनलाइन परीक्षा फॉर्ममध्ये आधार क्रमांकासाठी जागा ठेवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांंकडे आधार क्रमांक उपलब्ध आहे, त्यांनी तो भरावा; मात्र आधार क्रमांक भरणे सर्वांंना बंधनकारक नाही., असे मंडळाने स्पष्ट केले आहे.