शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कांदे, बटाटे जीवनावश्यक कायद्यात नको

By admin | Updated: July 12, 2014 01:52 IST

‘लोकमत’च्या परिचर्चेत केंद्र शासनाच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध.

अकोला : कांदे आणि बटाटे हे दैनंदिन जीवनात उपयोगात आणले जात असले तरी हे दोन्ही पदार्थ नसले तर फारसे अडत नाही. त्यामुळे कांदे आणि बटाटे यांना जीवनावश्यक कायद्यात टाकण्याची फारशी गरज नाही. यापेक्षा साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. यामुळे भावावर नियंत्रण राहील आणि शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागणार नाही, असे मत शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्या परिचर्चेत कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व शेतकरी संघटनेचे नेते यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने शुक्रवारी ह्यकेंद्र शासनाने कांदे व बटाटे यांना एपीएमसी अँक्टमधून वगळून जीवनावश्यक करण्याचा घेतलेला निर्णय योग्य की चूकह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे, माजी सभापती शिरीष धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते महादेवराव भुईभार, अँड. रामसिंग राजपूत, काँग्रेस किसान सेलेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महाराष्ट्र कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर, शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, कांदे-बटाटे व्यावसायिक गणेश पवित्रकार आदी सहभागी झाले होते. सर्वच वक्त्यांनी कांदे बटाट्यांना जीवनावश्यक कायद्यात सहभागी करण्याची आवश्यकता नसल्याचे मत मांडले. कांदा आणि बटाट्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठय़ात प्रमाणात होऊ लागला आहे. तरीदेखील कांदे व बटाटे न खाल्ल्यामुळे काही नुकसान होते असे नाही. हे पदार्थ नाही खाल्ले तरी चालतात. त्यामुळे इतर महत्त्वाच्या पदार्थांना सोडून कांदे, बटाट्यांना जीवनावश्यक कायद्यात बसविणे चुकीचे ठरेल, असे मत वक्त्यांनी मांडले. बटाट्यांवर प्रक्रिया करून जे पदार्थ तयार केले जातात ते अव्वाच्या सव्वा भावात विकले जातात. त्याबद्दल कोणाचीच ओरड नसते. बटाटे आणि कांद्यांच्या किंमती थोड्याशा वाढल्या तर ओरड सुरू झाली. यापेक्षा इतर भाज्या कितीतरी महाग आहेत; परंतु त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. केवळ व्यापार्‍यांचा विचार करून शासन निर्णय घेत आहे. शेतकर्‍यांना कृषि उत्पन्न बाजार समितीचा आधार आहे.बाजार समिती नसेल तर शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापेक्षा साठेबाजांवर शासनाने नियंत्रण आणावे, असा विचार वक्त्यांनी मांडला. शेतीमध्ये एफडीआय आणावे, असा विचारदेखील काही वक्त्यांनी बोलून दाखविला. एकूणच कांदे व बटाटे जीवनावश्यक कायद्यात घालू नये, असा विचार वक्त्यांनी बोलून दाखविला.