शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

कांदे, बटाटे जीवनावश्यक कायद्यात नको

By admin | Updated: July 12, 2014 01:52 IST

‘लोकमत’च्या परिचर्चेत केंद्र शासनाच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध.

अकोला : कांदे आणि बटाटे हे दैनंदिन जीवनात उपयोगात आणले जात असले तरी हे दोन्ही पदार्थ नसले तर फारसे अडत नाही. त्यामुळे कांदे आणि बटाटे यांना जीवनावश्यक कायद्यात टाकण्याची फारशी गरज नाही. यापेक्षा साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. यामुळे भावावर नियंत्रण राहील आणि शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागणार नाही, असे मत शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्या परिचर्चेत कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व शेतकरी संघटनेचे नेते यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णच्यावतीने शुक्रवारी ह्यकेंद्र शासनाने कांदे व बटाटे यांना एपीएमसी अँक्टमधून वगळून जीवनावश्यक करण्याचा घेतलेला निर्णय योग्य की चूकह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे, माजी सभापती शिरीष धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते महादेवराव भुईभार, अँड. रामसिंग राजपूत, काँग्रेस किसान सेलेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महाराष्ट्र कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर, शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, कांदे-बटाटे व्यावसायिक गणेश पवित्रकार आदी सहभागी झाले होते. सर्वच वक्त्यांनी कांदे बटाट्यांना जीवनावश्यक कायद्यात सहभागी करण्याची आवश्यकता नसल्याचे मत मांडले. कांदा आणि बटाट्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठय़ात प्रमाणात होऊ लागला आहे. तरीदेखील कांदे व बटाटे न खाल्ल्यामुळे काही नुकसान होते असे नाही. हे पदार्थ नाही खाल्ले तरी चालतात. त्यामुळे इतर महत्त्वाच्या पदार्थांना सोडून कांदे, बटाट्यांना जीवनावश्यक कायद्यात बसविणे चुकीचे ठरेल, असे मत वक्त्यांनी मांडले. बटाट्यांवर प्रक्रिया करून जे पदार्थ तयार केले जातात ते अव्वाच्या सव्वा भावात विकले जातात. त्याबद्दल कोणाचीच ओरड नसते. बटाटे आणि कांद्यांच्या किंमती थोड्याशा वाढल्या तर ओरड सुरू झाली. यापेक्षा इतर भाज्या कितीतरी महाग आहेत; परंतु त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. केवळ व्यापार्‍यांचा विचार करून शासन निर्णय घेत आहे. शेतकर्‍यांना कृषि उत्पन्न बाजार समितीचा आधार आहे.बाजार समिती नसेल तर शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापेक्षा साठेबाजांवर शासनाने नियंत्रण आणावे, असा विचार वक्त्यांनी मांडला. शेतीमध्ये एफडीआय आणावे, असा विचारदेखील काही वक्त्यांनी बोलून दाखविला. एकूणच कांदे व बटाटे जीवनावश्यक कायद्यात घालू नये, असा विचार वक्त्यांनी बोलून दाखविला.