शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

येत्या नोव्हेंबरमध्ये कांद्याला मिळणार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर !

By admin | Updated: August 25, 2016 22:40 IST

राज्यात प्रथमच कांद्याचे दर पाच पैसे प्रतिकिलो एवढे घसरले असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असताना येत्या नोव्हेेंबरमध्ये मात्र कांद्याला प्रतिक्विंटल

-  राजरत्न सिरसाट
 
अकोला, दि.25 - राज्यात प्रथमच  कांद्याचे दर पाच पैसे प्रतिकिलो एवढे घसरले असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असताना येत्या नोव्हेेंबरमध्ये मात्र कांद्याला प्रतिक्विंटल ७४० ते ८०० रुपये भाव मिळण्याची शक्यता राष्टÑीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन, कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे. 
महाराष्टÑ देशात कांदा उत्पादनात अग्रगण्य असून, लागवड क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्टÑाचा उत्पादनाचा वाटा हा २७ टक्के (४५.४६ दशलक्ष टन) एवढा तर क्षेत्र ४.६६ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्टÑासह कर्नाटक, गुजरात, बिहार, आंध्रप्रदेश तामिळनाडू, राजस्थान आणि हरियाणा हे महत्त्वाची कांदा उत्पादक राज्ये आहेत. राष्टÑीय बागायती संशोधन व विकास संस्थेच्या माहितीनुसार महाराष्टÑात २०१४-१५ मध्ये ४.६८ दशलक्ष हेक्टर क्षेत्र व उत्पादन ५८.६४ दशलक्ष टन एवढे होते. 
कांद्याचे उत्पादन व किमतीचा कल या सर्व बाबींचा विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी,अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग तसेच नवी दिल्लीच्या राष्टÑीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन केंद्र (एनआयएपी) कृषी विपनण संशोधन केंद्राच्या चमूने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा बाजारपेठेतील मागील १२ वर्षांच्या कालावधीतील मासिक सरासरी किमतीचे पृथ्थकरण केले. या केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सामान्य हवामात वेगवेगळ््या प्रतिनुसार येणाºया नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या सरासरी किमती ७४० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
- कांदा उत्पादनात भारत जगात दुसरा 
कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक  (१६.८२ टक्के) असून, द्वितीय क्रमांक (२७ टक्के) चीनचा लागतो; परंतु इतर देशाच्या तुलनेत भारताची कांदा उत्पादकता १४२१ टन प्रतिहेक्टर आहे. भारतातील कांद्याला जगात मलेशिया, बांगलादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशात खूप मागणी आहे. 
 
- येणाºया नोव्हेंबरमध्ये कांद्याला सरासरी ७४० ते ८०० रू पये प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे; परंतु आयात-निर्यात धोरणात जर बदल झाले आणि हवामानात बदल झाला तर या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होेऊ शकतो. ही माहिती शेतकºयांना पीक, पेरणी व निविष्ठा वापराच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यात उपयुक्त ठरेल.
- डॉ. राजेंद्र देशमुख,
विभाग प्रमुख,
कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग,
डॉ. पंदेकृवि,अकोला.