शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी - अरूणभाई गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:17 IST

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.

ठळक मुद्दे  स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे शानदार उद्घाटन

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळातर्गंत स्वराज्य भवन प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प गुलाबराव महाराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी आ. गजानन दाळू गुरूजी, सावळे गुरूजी, सुशील महाराज वणवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, डॉ. पुरूषोत्तम तायडे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा. डॉ. संतोष हुशे, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदिश पाटील मुरूमकार, कृष्णा अंधारे, मनोज तायडे, नगरसेवक हरिश आलिमचंदानी, डॉ. स्वप्नील ठाकरे, दिलीप आसरे, काशीराव पाटील, प्रा. बाविसकर, रामदास देशमुख, सुधा जवंजाळ, रवींद्र मुंडगावकर, गंगाधरराव पाटील, मधुकरराव सरप, जिल्हा सेवाधिकारी किशोर वाघ, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, विजय जानी आदी होते.अरूणभाई गुजराथी म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावोगावी फिरून वैश्विक, सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. १९९५५ मध्ये राष्ट्रसंत जपानला गेले आणि भजन, खंजरीने त्यांनी जपानमधील लोकांची मने जिंकली. महात्मा गांधीची देशभक्ती आणि राष्ट्रसंताची देवभक्तीने समन्वय साधला होता. दोघांचेही विचार समाजासाठी प्रेरक आहेत. राष्ट्रसंतांचा विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. असे सांगत, गुजराथी यांनी, जीवनात सेवा नसेल तर सर्व व्यर्थ आहे. आसक्ती, स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थपणे परमार्थ करा. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास जीवनात महत्वाचा आहे. अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी केले. संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले तर आभार गजानन काकड यांनी मानले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजSwarajya Bhavanस्वराज्य भवन