शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी - अरूणभाई गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:17 IST

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.

ठळक मुद्दे  स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे शानदार उद्घाटन

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्रामगीता ही राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामगितेतील विचार अंगीकारला पाहिजे. ग्रामगितेतील एक-एक ओळ क्रांती निर्माण करणारी आहे. असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले.अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळातर्गंत स्वराज्य भवन प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प गुलाबराव महाराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी आ. गजानन दाळू गुरूजी, सावळे गुरूजी, सुशील महाराज वणवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, डॉ. पुरूषोत्तम तायडे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा. डॉ. संतोष हुशे, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदिश पाटील मुरूमकार, कृष्णा अंधारे, मनोज तायडे, नगरसेवक हरिश आलिमचंदानी, डॉ. स्वप्नील ठाकरे, दिलीप आसरे, काशीराव पाटील, प्रा. बाविसकर, रामदास देशमुख, सुधा जवंजाळ, रवींद्र मुंडगावकर, गंगाधरराव पाटील, मधुकरराव सरप, जिल्हा सेवाधिकारी किशोर वाघ, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, विजय जानी आदी होते.अरूणभाई गुजराथी म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावोगावी फिरून वैश्विक, सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. १९९५५ मध्ये राष्ट्रसंत जपानला गेले आणि भजन, खंजरीने त्यांनी जपानमधील लोकांची मने जिंकली. महात्मा गांधीची देशभक्ती आणि राष्ट्रसंताची देवभक्तीने समन्वय साधला होता. दोघांचेही विचार समाजासाठी प्रेरक आहेत. राष्ट्रसंतांचा विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. असे सांगत, गुजराथी यांनी, जीवनात सेवा नसेल तर सर्व व्यर्थ आहे. आसक्ती, स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थपणे परमार्थ करा. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास जीवनात महत्वाचा आहे. अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांनी केले. संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले तर आभार गजानन काकड यांनी मानले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजSwarajya Bhavanस्वराज्य भवन