शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत एक लाख भारतीय घेतात शिक्षण- टीबोर पी. नाझ

By admin | Updated: February 6, 2016 02:24 IST

डॉ.पंदेकृविचा ३0 वा दीक्षांत समारंभात १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान.

अकोला: अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठासह इतर विद्यापीठांमध्ये भारतातील जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतात बहुराष्ट्रीय उद्योग अधिकाधिक गुंतवणूक करीत असल्याने त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला तर होईलच, महत्त्वाचे म्हणजे उच्च व तंत्र शिक्षणाला बळकटी येईल. याचा फायदा विद्यार्थ्यांंना होणार असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे टीबोर पी.नाझ यांनी शुक्रवारी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३0 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.या समारंभात १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांंचे कौतुक करताना नाझ म्हणाले की, इतर शंभर देशांतील विद्यार्थ्यांंच्या तुलनेत अमेरिकेत आपले स्थान सिद्ध केले असूून, हे विद्यार्थी नावीन्यपूर्ण संशोधन करीत आहेत. त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर अध्यापणाचे कामदेखील सुरू केले आहे. सर्वांंत महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा भारतीय विद्यार्थी मायदेशी परततील तेव्हा ते या देशात परिवर्तन आणण्यासाठी मोलाचे योगदान करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भारत आणि अमेरिका यांच्या शैक्षणिक संस्थांमधील सहयोग आणि भागीदारीमुळे विज्ञान, उद्योग आणि कृषिक्षेत्रात प्रगती होत असून, दोन्ही देशांतील परस्पर संबंध अधिक दृढ होत असल्याचे ते म्हणाले. संपलेले वर्ष परिवर्तनाचे होते. सद्यस्थितीत अंतराळ, सहकार, सायबर सुरक्षा, जागतिक सुरक्षा, नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांमध्ये ३0 पेक्षा अधिक समूह आणि शासनस्तरावरील संवाद स्थापित झाला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषिक्षेत्रासमोरील आव्हाने, उत्पादकता व उत्पन्नवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी, साठवणूक प्रणालीच्या सशक्तीकरणासाठी आम्ही एकत्र काम करीत असून, जमीन व पाण्याच्या स्रोताच्या शाश्‍वत वापराच्या विकासासाठी संयुक्तपणे मार्ग शोधत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक, एकत्र काम, क्षमता, आत्मविश्‍वासाच्या बळावर भारत आणि अमेरिका लवकरच सर्व समस्यांवर मात करतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावर्षी कृषी अभ्यासक्रमाच्या विविध शाखांचे व कृषी अभियांत्रिकी शाखेचे मिळूून २0६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी १३८७ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून पदवी ग्रहण केली.