शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

अकाेला जिल्ह्यात एक लाख ३७ हजार दुचाकी विम्याशिवाय धावतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:10 IST

two-wheelers run without insurance दुचाकीवरील कर्ज निल हाेताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे विमा काढण्याकडे कानाडाेळा करण्यात येत असल्याची माहिती समाेर आली आहे. अपघात झाल्यास वाहनचालकाला माेठा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

अकाेला : शहरासह जिल्ह्यात एक लाख ३७ हजारांपेक्षा अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर बिनधास्त धावत असल्याची माहिती समाेर आली आहे. ज्या वाहनचालकांनी बॅंकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येताे, मात्र बॅंकेचे दुचाकीवरील कर्ज निल हाेताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात ५७ हजारांपेक्षा अधिक चारचाकी वाहने असून, दाेन लाख ४० हजारांपेक्षा जास्त् दुचाकी आहेत. यासाेबतच दाेन हजारांवर ट्रक आणि ट्रान्सपाेर्ट व्यवसायात असलेली चारचाकी वाहने वेगळी आहेत. या वाहनांची संख्या चार लाखांच्या घरात असून, यामधील एक लाख ३७ हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांनी विमा काढला नसल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. वाहनचालक विमा काढतात कींवा नाही यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा वाॅच असताे मात्र लाखाे वाहनांची ही तपासणी करणे त्यांनाही माेठ्या अडचणीचे असल्याने वाहनचालक विमा काढण्याकडे पाठ करीत असल्याची माहिती समाेर आली आहे. वाहनांचा विमा नसताना अपघात झाल्यास याचे परिणाम भयंकर असतानाही याकडे वाहनचालक सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने ही वाहने धाेकादायक ठरत आहेत. दीड लाखांपेक्षा अधिक दुचाकी या विमा न काढताच रस्त्यावर असल्याची माहिती असून, यासह दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या चारचाकी वाहनांचाही विमा काढण्याकडे कानाडाेळा करण्यात येत असल्याची माहिती समाेर आली आहे.

 

विमा नसल्याचे धाेके

एखाद्या वाहनाचा विमा नसतानाही ते वाहन रस्त्यावर चालत असेल आणि अशात अपघात झाल्यास वाहनचालकाला माेठा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. यासाेबतच न्यायालयात खटला चालल्यानंतर शिक्षा हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विमा न काढताच वाहन चालविण्याचे संभाव्य धाेके जास्त असल्याने वाहनचालकांनी विमा असतानाच वाहन चालवावे.

 

वाहनाचा विमा नसताना वाहन रस्त्यावर चालविणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काेणत्याही वाहनचालकाने असा प्रकार करू नये. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र लाखाे दुचाकींवर तांत्रिकदृष्ट्या कारवाई करणेही शक्य नाही. त्यामुळे वाहनचालकांची सजगता बाळगून विमा काढणे गरजेचे आहे.

- विनाेद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला

 

टॅग्स :AkolaअकोलाRto officeआरटीओ ऑफीस