शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

एकाच दिवशी ११ शेतक-यांनी घेतला विषाचा घोट

By admin | Updated: August 17, 2015 01:40 IST

एकाचा मृत्यू, १0 जणांवर उपचार सुरू.

सचिन राऊत / अकोला : अस्मानी व सुलतानी संकटाने घायाळ झालेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील तब्बल ११ शेतकर्‍यांनी एकाच दिवशी म्हणजे रविवारी विषाचा घोट घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. यामधील एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून, उर्वरित १0 शेतकर्‍यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबार पेरणी केल्यानंतरही पाऊस न आल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी सावरत तिबार पेरणी केली. मात्र, या पेरणीनंतर पाऊस प्रचंड प्रमाणात आल्याने अनेक शेतकर्‍यांची पिकं पाण्याखाली गेली. यावर शासनाकडून मदत मिळेल किंवा पीककर्जाचे पुनगर्ठन होईल, या आशेने जगत असलेल्या शेतकर्‍यांना पीककर्ज पुनर्गठनाचा कुठलाही आधार मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, रविवारी एकाच दिवशी ११ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ८ शेतकरी अकोला जिल्हय़ातील असून, दोन वाशिम तर एक शेतकरी बुलडाणा जिल्हय़ातील आहे. वाशिम जिल्हय़ातील दिनकर नारायणराव भगत (४५) यांचा सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १0 शेतकर्‍यांवर उपचार सुरू असून, त्यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

*या शेतक-यांनी घेतले विष

      गजानन मारोती भिसे (१८) रा. बाळापूर, गजानन दादाराव चौधरी (३५) रा. आकोट, सुनील हिंमतराव गोमासे (३0) रा. बोरगाव मंजू, अ. शफीक अ. रउफ (२0) रा. वाशिम, प्रतिभा नवले (२५) रा. बोरगाव मंजू, गजानन दत्तात्रय कुरडे (२५) रा. महान, मारोती सोनोने (६0) रा. बुलडाणा, मिलिंद राजू भगत (२0) रा. पिंजर, दत्ता रघुनाथ सोळंके (२४) रा. आकोट, मंगेश दिनेश चक्रनारायण (२५) रा. बोरगाव मंजू या शेतकर्‍यांनी विष प्राशन केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर दिनकर नारायण भगत (४५) रा. वाशिम यांचा मृत्यू झाला.