शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

एकाचे मुंबई, दुसऱ्याचे बारामतीकडे लक्ष; राज्य वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक संक्रमण होण्याची शक्यता आहे; मात्र या संदर्भात राज्यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसून, राज्य सरकार झोपेत असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीकडे लक्ष असून, राज्य वाऱ्यावर असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे सोडले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट वर्तमान संक्रमणापेक्षा चारपट अधिक राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामध्ये विशेषतः १८ वर्षांखालील बालके आणि युवकांना संक्रमण होण्याची शक्यता आहे, परंतु तिसरी लाट नियंत्रित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसून, राज्य सरकार झोपलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे केवळ मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे केवळ बारामतीकडे लक्ष असून, महाराष्ट्र राज्य वाऱ्यावर असल्यासारखी परिस्थिती असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, राज्य सरकारने किमान जिल्हानिहाय ‘डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी’ स्थापन केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. कोरोनाबधित रुग्णांसाठी सरकारने रुग्णवाहिकांची सोय करावी, नाहीतर खासगी गाड्या रुग्णवाहिका म्हणून वापरण्याची परवानगी देण्याची मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, डॉ. प्रसन्नजीत गवई, चंद्रशेखर पांडे गुरुजी, पराग गवई, आदी उपस्थित होते.

--------------

शासनाची हलगर्जी; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो!

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये शासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्यात लोक दगावले असून, या संदर्भात शासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

------------------------

लसींचा तुटवडा : मोदी सरकार जबाबदार!

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण होणे, लसीकरणाचा कालावधी २८ दिवसांवरुन ८४ दिवसांपर्यंत वाढविणे, या सर्व प्रकाराला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे कोणतेही धोरण नाही, असेही त्यांनी सांगितले.