शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

एकाचे मुंबई, दुसऱ्याचे बारामतीकडे लक्ष; राज्य वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक संक्रमण होण्याची शक्यता आहे; मात्र या संदर्भात राज्यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसून, राज्य सरकार झोपेत असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीकडे लक्ष असून, राज्य वाऱ्यावर असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे सोडले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट वर्तमान संक्रमणापेक्षा चारपट अधिक राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामध्ये विशेषतः १८ वर्षांखालील बालके आणि युवकांना संक्रमण होण्याची शक्यता आहे, परंतु तिसरी लाट नियंत्रित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसून, राज्य सरकार झोपलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे केवळ मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे केवळ बारामतीकडे लक्ष असून, महाराष्ट्र राज्य वाऱ्यावर असल्यासारखी परिस्थिती असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, राज्य सरकारने किमान जिल्हानिहाय ‘डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी’ स्थापन केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. कोरोनाबधित रुग्णांसाठी सरकारने रुग्णवाहिकांची सोय करावी, नाहीतर खासगी गाड्या रुग्णवाहिका म्हणून वापरण्याची परवानगी देण्याची मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, डॉ. प्रसन्नजीत गवई, चंद्रशेखर पांडे गुरुजी, पराग गवई, आदी उपस्थित होते.

--------------

शासनाची हलगर्जी; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो!

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये शासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्यात लोक दगावले असून, या संदर्भात शासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

------------------------

लसींचा तुटवडा : मोदी सरकार जबाबदार!

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण होणे, लसीकरणाचा कालावधी २८ दिवसांवरुन ८४ दिवसांपर्यंत वाढविणे, या सर्व प्रकाराला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे कोणतेही धोरण नाही, असेही त्यांनी सांगितले.