शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

एकाचे मुंबई, दुसऱ्याचे बारामतीकडे लक्ष; राज्य वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक संक्रमण होण्याची शक्यता आहे; मात्र या संदर्भात राज्यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसून, राज्य सरकार झोपेत असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीकडे लक्ष असून, राज्य वाऱ्यावर असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे सोडले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट वर्तमान संक्रमणापेक्षा चारपट अधिक राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामध्ये विशेषतः १८ वर्षांखालील बालके आणि युवकांना संक्रमण होण्याची शक्यता आहे, परंतु तिसरी लाट नियंत्रित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसून, राज्य सरकार झोपलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे केवळ मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे केवळ बारामतीकडे लक्ष असून, महाराष्ट्र राज्य वाऱ्यावर असल्यासारखी परिस्थिती असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, राज्य सरकारने किमान जिल्हानिहाय ‘डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी’ स्थापन केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. कोरोनाबधित रुग्णांसाठी सरकारने रुग्णवाहिकांची सोय करावी, नाहीतर खासगी गाड्या रुग्णवाहिका म्हणून वापरण्याची परवानगी देण्याची मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, डॉ. प्रसन्नजीत गवई, चंद्रशेखर पांडे गुरुजी, पराग गवई, आदी उपस्थित होते.

--------------

शासनाची हलगर्जी; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो!

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये शासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्यात लोक दगावले असून, या संदर्भात शासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

------------------------

लसींचा तुटवडा : मोदी सरकार जबाबदार!

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण होणे, लसीकरणाचा कालावधी २८ दिवसांवरुन ८४ दिवसांपर्यंत वाढविणे, या सर्व प्रकाराला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे कोणतेही धोरण नाही, असेही त्यांनी सांगितले.