शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दीड कोटीचा प्रस्ताव!

By admin | Updated: July 3, 2017 02:12 IST

अकोला : विमा न काढलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटी ३९ लाख ९८ हजार ४६८ रुपये मदत निधी मागणी शासनाकडे सादर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पीक नुकसान झालेल्या मात्र पीक विमा न काढलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटी ३९ लाख ९८ हजार ४६८ रुपये मदत निधी मागणीचा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० जून रोजी शासनाकडे सादर करण्यात आला.गतवर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते आॅक्टोबर २०१६ या चार महिन्यांच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेती पिके आणि फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर या चार तालुक्यांत २ हजार १२८ शेतकऱ्यांचे १ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल गत ८ मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता; परंतु अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकरी आणि शेतीच्या क्षेत्रापैकी गतवर्षी पीक विमा काढलेले शेतकरी आणि पीक नुकसानाचे क्षेत्र वगळून,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या मदत निधीची माहिती सादर करण्याचे निर्देश शासनाचे मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी १२ जून २०१७ रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात गतवर्षी पीक विमा न काढलेल्या १ हजार ८६४ शेतकऱ्यांच्या २ हजार ५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानभरपाईपोटी १ कोटी ३९ लाख ९८ हजार ४६८ रुपये मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २० जून रोजी शासनाकडे सादर करण्यात आला.