शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

लोकलेखा समितीपुढे अधिका-यांची साक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 02:37 IST

अकोला जिल्हा परिषदेत घोळाच्या पृष्ठभूमीवर अधिका-यांचा मुंबईत ठिय्या.

अकोला, दि. १९- भारताच्या महालेखाकारांनी केलेल्या अंकेक्षणातील मुद्यांवर जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने ग्रामविकास विभाग सचिवाकडून साक्ष घेतली. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्यासह विभाग प्रमुखांना गुरुवारी बोलाविण्यात आले. काही मुद्यांवरील साक्ष नोंदणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून शासन तसेच सेसफंडातील निधी खर्च केला जातो. त्यातून विविध विकास कामे केली जातात. त्याचवेळी त्या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात गोंधळही केले जातात. त्या बाबी अंकेक्षणात पुढे येतात. त्यातून वसूलपात्र ठरणारी रक्कम, खर्चातील अनियमितता अंकेक्षणात उघड होते. त्यावर संबंधित विभाग प्रमुखांकडून योग्य स्पष्टीकरण, अनुपालन मागवून पुढील कारवाईसाठी जबाबदारीही निश्‍चित केली जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची लोकलेखा समितीकडून साक्ष नोंदविली जात आहे. भारताच्या महालेखाकारांकडून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांचे अंकेक्षण दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यामध्ये २00७-0८ ते २0११-१२ या काळातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बांधकाम विभागातील सहा कामे नियमबाहय़ असल्याचे आढळून आले. तसेच वित्त विभागाने विभाग प्रमुखांना दिलेल्या अग्रीम रकमांचा हिशेब न घेता ती रक्कम तशीच ठेवण्यात आली. या मुद्यांवर संबंधित विभाग प्रमुखांना सबळ कारणासह स्पष्टीकरण मागविण्यात आले. बांधकाम विभागातील २0 पैकी दोन कामे अद्यापही प्रलंबित असल्याचाही मुद्दा त्यामध्ये आहे.वित्त विभागाने विविध विभाग प्रमुखांना दिलेल्या ४८ लाख रुपये अग्रिमाचे समायोजन अद्यापही झालेले नाही. ते न करण्याचाही खुलासाही मागविण्यात आला.ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना समितीपुढे उपस्थित राहावे लागले. त्यांना सर्व मुद्यांची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता वाठ यांना मुंबईत बोलाविण्यात आले. स्थानिक लेखा परीक्षणातही गंभीर मुद्देशासनाने दिलेला निधी वेळेत खर्च करणे, त्याचवेळी हिशेब ठेवणे, शिल्लक निधी शासन खात्यावर जमा करणे, यासाठीची कायदेशीर पद्धत शासनाने ठरवून दिलेली आहे. त्यासाठी १२ मे २000 रोजी ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून वेळापत्रकही दिले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८ चे नियम ६५ नुसार घातलेले नियमही देण्यात आले. त्यानुसार वार्षिक लेखे पुढील वर्षीच्या जूनपर्यंंत प्रसिद्ध करून त्याचे उतारे ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित खातेप्रमुख, प्रशासकीय विभाग, नियंत्रक अधिकार्‍यांना उपलब्ध करून देणे, शासन अनुदानाची अखर्चित शिल्लक रक्कम जून महिन्यापूर्वी भरणा करणे बंधनकारक आहे; मात्र या नियमाला जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच विभागप्रमुखांनी गेल्या अनेक वर्षात बगल दिल्याचे प्रकारही स्थानिक लेखा परीक्षणात उघड झाले आहेत. कोट्यवधींच्या धनाकर्षांंचाही तोच प्रकारजिल्हा परिषदेत लेखा संहितेचा भंग करणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, महिला व बालकल्याण विभागाने २0१0-११ मध्ये जिल्हय़ात ३0 पेक्षाही अधिक अंगणवाडी बांधकामासाठी एक कोटी सात लाख रुपयांचे धनादेश न देता धनाकर्ष काढून ठेवले. ते अद्यापही पडून आहेत. शासनाचा हा निधी वर्षानुवर्ष कसा पडून राहतो, त्याचा हिशेब लेखा संहितेनुसार कसा घेतला जात नाही. हा प्रश्नच या निमित्ताने उपस्थित होत आहे.