शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

भाजपमुळे ‘ओबीसीं’चे हक्क धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 02:00 IST

ओबीसी युवक मेळावा : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भाजपा-रा.स्व. संघाला सत्ता चालवायची नाही तर गाजवायची असून, सर्वसामान्यांना गुलाम करायचे आहे, भाजप-संघाचे सरकार देशातील ‘ओबीसीं’ना काही देत नाही; मात्र जे न्याय-हक्क मिळाले ते काढून घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.येथील आबासाहेब खेडकर सभागृहाच्या प्रांगणात भारिप-बमसंच्यावतीने आयोजित ओबीसी युवक मेळाव्यात ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, रा.स्व. संघ-भाजपाला संतांची परंपरा मोडीत काढायची आहे. त्यासाठी मनुवादी व्यवस्थेचा प्रचार करण्यात येत आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नसल्याचा आरोप करीत सरसकट नाही तर किमान दहा एकराआतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विद्यमान सरकार सर्वसामान्य आणि शेतकरी हिताचे नसून, व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपा-रा.स्व. संघ देशावरील एक संकट असून, राजकीय पक्ष संपले तर, राजकीय व्यवस्था संपेल आणि राजकीय व्यवस्था संपली तर हुकूमशाही येईल, असा इशारा देत राजकारणातील प्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-रा.स्व. संघाची सत्ता येणार नाही, याबाबत ओबीसींसह सर्वांनीच खूणगाठ बांधा, असे आवाहनही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले.भाषणांना फाटा; ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले मनोगत!ओबीसी युवक मेळाव्यात केवळ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे या मेळाव्यात नेत्यांच्या भाषणांना फाटा देण्यात आला. प्रमुख मार्गदर्शनापूर्वी नेत्यांऐवजी ओबीसी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये डॉ. चंद्रशेखर वडतकार, अ‍ॅड. देवानंद फुसे, नंदकिशेर बोर्डे, संजय पुंडकर, अ‍ॅड. संतोष रहाटे, विक्रम जाधव, कैलास खडसान इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.