शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

व-हाडातील आंबा बहरलाच नाही!

By admin | Updated: April 9, 2016 01:35 IST

अत्यल्प पावसाचा फटका; संकरीत आंब्यावर यंदाची ‘रसाई’

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (जि.बुलडाणा) अत्यल्प पावसामुळे फळांचा राजा आंब्याच्या मुळाशी पाणी पोहचले नसल्याने यावर्षी पश्‍चिम वर्‍हाडातील गावरान आंबा बहरलाच नाही. त्यामुळे वर्‍हाडवासीयांना परप्रांतातून येणार्‍या संकरीत आंब्यावर यंदाची रसाई करावी लागणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतीच्या बांधावर गावरान आंबा बहरताना दिसतो. गावरान आंब्याचे झाड वर्षाकाठी १0 ते १५ हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न सहज देऊन जाते. पायरी जातीच्या आंबा पिकासाठी पश्‍चिम वर्‍हाडातील वातावरण पोषक आहे. पायरीला १४ फेब्रुवारीनंतर मोठय़ा प्रमाणात मोहर येतो; यावेळी मात्र नेमका बहर लागण्याच्या मोसमात अवकाळी पावसासह गारपीटीचा फटका बसल्याने जेमतेम लागलेला मोहरही गळून गेला. परिणामी आता कोकणातून येणार्‍या केसर, दशहरी, लंगडा, नीलम आदिसारख्या संकरीत आंब्याच्या रसावरच वर्‍हाडवासीयांना अवलंबून राहावे लागणार आहे. वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने विदर्भातील आंब्याचा फुलोरा पुर्णपणे झडला असल्यामुळे या हंगामात आंब्याचे भावही वाढण्याची शक्यता आहे.शंभर ते दीडशे रुपये दर!गुढीपाडव्यापासून गावरान आंबा बाजारात येतो; मात्र यंदा गावरान आंब्याला अत्यल्प पावसाचा फटका बसल्याने बाजारात केवळ संकरीत आंबे आले आहेत. साधारणत: १00 ते १५0 रुपये किलो असा दर सध्या आहे.