शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराच्या खर्च र्मयादा ७.५ टक्क्यांनी वाढली!

By admin | Updated: November 6, 2014 23:29 IST

शालेय पोषण आहाराच्या सुधारित दराला मान्यता.

बुलडाणा : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शालेय पोषण आहार योजनेच्या खर्च र्मयादेत केंद्र शासनाने ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. शालेय पोषण आहार योजनेतील प्रति लाभार्थी आहार खर्च र्मयादा आतापर्यंत तीन ते पाच रुपये एवढी होती; मात्र केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून खर्च र्मयादेत ७.५ टक्यांनी वाढ केली असून, प्रति लाभार्थी खर्च र्मयादा साडेतीन ते साडेपाच रुपये एवढी निश्‍चित करण्यात आली आहे. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५0 उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १00 ग्रॅम, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १५0 ग्रॅम तांदळाचा पुरवठा केला जातो.या तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजवण्याचे दर ६ डिसेंबर २0१३ रोजी निश्‍चित करून प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३ रुपये ३४ पैसे, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५ रुपयांपयर्ंत प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. आता केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून या खर्च र्मयादेत ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. पोषण आहार योजनेसाठी केंद्र सरकार ७५ टक्के, तर राज्य सरकार २५ टक्के भार उचलणार आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही सुधारित दरास २८ ऑक्टोबर रोजी मान्यता दिलीे. सुधारित दरानुसार, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३.५९ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५.३८ रुपये खर्च र्मयादा निश्‍चित करण्यात आली आहे.