शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पोषण आहाराच्या खर्च र्मयादा ७.५ टक्क्यांनी वाढली!

By admin | Updated: November 6, 2014 23:29 IST

शालेय पोषण आहाराच्या सुधारित दराला मान्यता.

बुलडाणा : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शालेय पोषण आहार योजनेच्या खर्च र्मयादेत केंद्र शासनाने ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. शालेय पोषण आहार योजनेतील प्रति लाभार्थी आहार खर्च र्मयादा आतापर्यंत तीन ते पाच रुपये एवढी होती; मात्र केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून खर्च र्मयादेत ७.५ टक्यांनी वाढ केली असून, प्रति लाभार्थी खर्च र्मयादा साडेतीन ते साडेपाच रुपये एवढी निश्‍चित करण्यात आली आहे. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५0 उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १00 ग्रॅम, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १५0 ग्रॅम तांदळाचा पुरवठा केला जातो.या तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजवण्याचे दर ६ डिसेंबर २0१३ रोजी निश्‍चित करून प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३ रुपये ३४ पैसे, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५ रुपयांपयर्ंत प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. आता केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून या खर्च र्मयादेत ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. पोषण आहार योजनेसाठी केंद्र सरकार ७५ टक्के, तर राज्य सरकार २५ टक्के भार उचलणार आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही सुधारित दरास २८ ऑक्टोबर रोजी मान्यता दिलीे. सुधारित दरानुसार, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३.५९ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५.३८ रुपये खर्च र्मयादा निश्‍चित करण्यात आली आहे.