शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

पोषण आहाराची खिचडी शिजलीच नाही!

By admin | Updated: May 26, 2015 02:39 IST

१७५ शाळांची पाहणी; अकोला जिल्ह्यातील विदारक स्थिती; शासनाचा निधी पाण्यात.

अकोला : शासनाद्वारे शालेय पोषण आहार योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असतानाही उन्हाळी सुट्यांमध्ये आहार योजनेचा बट्टय़ाबोळ झाल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने सोमवारी जिल्ह्यातील १७५ शाळांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यामातून उजेडात आणले आहे. शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्या असल्याने विद्यार्थी आहार ग्रहणासाठी येत नसल्याचा दावा शिक्षकांमधून करण्यात आला असला, तरी पालकांमध्ये जागृती करण्यात आणि विद्यार्थ्यांना आहाराची गोडी लावण्यात शिक्षक आणि शाळा व्यवस् थापन समित्यांना अपयश आल्याचेही प्रकर्षाने दिसून आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी, त्यांनी वर्षभर शाळेत यावे, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहाराचे वितरण करण्यात यावे, असा आदेशही शासनाने जारी केला. या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही, याची चाचपणी ह्यलोकमतह्ण चमूने सोमवारी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केली. जिल्ह्यातील बहुतांश शाळा समित्यांनी उन्हाळाच्या सुटीमध्ये विद्यार्थी येत नसल्याने पोषण आहार शिजविण्यात येऊ नये, असा ठराव घेतला. या ठरावाची माहितीही शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यामुळे शिक्षकही बिनधास्त असल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेबाबत आता विद्यार्थी, पालकांप्रमाणेच शिक्षकांमध्येही जनजागृती करणे आवश्यक आहे, यावर स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले.