शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:20 IST

बोरगाव मंजू : गत मार्च महिन्यापासून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित ...

बोरगाव मंजू : गत मार्च महिन्यापासून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित केले. या लाॅकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद केले होते. सध्या अनलॉक प्रक्रियेत पाचवी ते बारावीपर्यंत शाळा पुन्हा सुरू झाल्या आहे. बोरगाव मंजू परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन वर्ग सुरू केले होते. ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थ्यांनी अध्ययन केले. ज्या पालक, विद्यार्थ्यांकडे मोबाइल उपलब्ध नाहीत तसेच नेटवर्क प्राब्लेम आहे, अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध उपक्रम राबविले होते. गत नोव्हेंबरपासून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेत शाळा सुरू केल्या. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस कोरोनाची धास्ती असल्याने विद्यार्थिसंख्या घटली होती; मात्र सद्य:स्थितीत शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांची किलबिल सुरू असून, विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (फोटो)