शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडणा-यांची संख्या अधिक

By admin | Updated: December 16, 2014 01:19 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिका-यांची माहिती.

अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये १0,४३८ जणांचा मुत्यू झाला. यापैकी ५,२३१ अपघात हे रूळ ओलांडताना झाले असून, ५५ टक्के घटना या रूळ ओलांडताना घडल्याचे आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.राज्याची ह्यजीवनवाहिनीह्ण म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना झाल्याची नोंद रेल्वे प्रशासनाच्या लेखी झाली आहे. रेल्वे मार्गावर गेल्या तीन वर्षांत १0 हजार ४३८ अपघाती मृत पावणार्‍यांपैकी ५ हजार २३१ अपघात केवळ रूळ ओलांडताना झाले आहेत. यात बहुतांश मृत्यू रेल्वे स्थानकावर एका प्लॅटफार्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर रूळ ओलांडताना आणि रेल्वे कर्मचारी तैनात नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झाले आहेत. मानसिकता कारणीभूतराज्यात अनेक ठिकाणी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण झालेले आहेत. बहुतांश स्थानकांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पूल आहेत. रेल्वे प्रशासनानेदेखील अनेक ठिकाणी प्रवाशांना धोका न पत्करण्याबाबत सूचना फलक लावले आहेत. असे असतानाही पुलांचा वापर न करता सर्रास रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार नागरिक करीत आहेत. संरक्षक भिंतींनादेखील छेद देत नागरिकांनी छुपेमार्ग निर्माण केले असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना घडणार्‍या अपघातांचे प्रमाण राज्यातील रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे; तसेच ठिकठिकाणी राज्यात रेल्वे मार्गालगतच्या गावकर्‍यांनी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण केले आहेत. अशा ठिकाणी रूळ ओलांडताना अपघात घडल्याच्या घटनादेखील अधिक असल्याने नागरिकांनी मानसिकता बदल्याची गरज असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी दिली.