शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडणा-यांची संख्या अधिक

By admin | Updated: December 16, 2014 01:19 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिका-यांची माहिती.

अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये १0,४३८ जणांचा मुत्यू झाला. यापैकी ५,२३१ अपघात हे रूळ ओलांडताना झाले असून, ५५ टक्के घटना या रूळ ओलांडताना घडल्याचे आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.राज्याची ह्यजीवनवाहिनीह्ण म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना झाल्याची नोंद रेल्वे प्रशासनाच्या लेखी झाली आहे. रेल्वे मार्गावर गेल्या तीन वर्षांत १0 हजार ४३८ अपघाती मृत पावणार्‍यांपैकी ५ हजार २३१ अपघात केवळ रूळ ओलांडताना झाले आहेत. यात बहुतांश मृत्यू रेल्वे स्थानकावर एका प्लॅटफार्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर रूळ ओलांडताना आणि रेल्वे कर्मचारी तैनात नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झाले आहेत. मानसिकता कारणीभूतराज्यात अनेक ठिकाणी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण झालेले आहेत. बहुतांश स्थानकांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पूल आहेत. रेल्वे प्रशासनानेदेखील अनेक ठिकाणी प्रवाशांना धोका न पत्करण्याबाबत सूचना फलक लावले आहेत. असे असतानाही पुलांचा वापर न करता सर्रास रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार नागरिक करीत आहेत. संरक्षक भिंतींनादेखील छेद देत नागरिकांनी छुपेमार्ग निर्माण केले असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना घडणार्‍या अपघातांचे प्रमाण राज्यातील रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे; तसेच ठिकठिकाणी राज्यात रेल्वे मार्गालगतच्या गावकर्‍यांनी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण केले आहेत. अशा ठिकाणी रूळ ओलांडताना अपघात घडल्याच्या घटनादेखील अधिक असल्याने नागरिकांनी मानसिकता बदल्याची गरज असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी दिली.