शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

राज्यभरात ‘नरेगा’ची कामे ठप्प!

By admin | Updated: June 6, 2015 01:03 IST

जिल्हा परिषदेच्या सहा हजार अभियंत्यांचा कामावर बहिष्कार; ठोस निर्णय होईस्तोवर आंदोलन.

सुनिल काकडे /वाशिम : राज्यातील सुमारे ६ हजार जिल्हा परिषद अभियंत्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर बहिष्कार टाकल्यामुळे राज्यभरात ह्यनरेगाह्णची सर्वच कामे ठप्प झाली आहेत. रोजगार हमी योजनेची सन २00५ मध्ये महाराष्ट्रात मुहूर्तमेढ रोवल्या गेली. या कामांवर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची मदत घेण्यात यावी आणि स्वतंत्र यंत्रणा उभारल्यानंतर या अभियंत्यांना त्यांची मूळ कामेच सोपविल्या जावी, असे शासनाचेच निर्देश होते. मात्र, योजना सुरु होवून १0 वर्षाचा मोठा काळ उलटल्यानंतरही शासनाने दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे संतप्त झालेल्या राज्यभरातील ६ हजार अभियंत्यांनी १८ मे २0१५ पासून ह्यनरेगाह्णच्या सर्वच कामांवर राज्यव्यापी बहिष्कार टाकला आहे. अभियंत्यांच्या या आंदोलनात्मक पावित्र्यामुळे आजमितीस ह्यनरेगाह्णअंतर्गत राबविण्यात येणारी जवाहर विहिर योजना, फळबाग लागवड, जुन्या राज्य रोजगार हमी योजनेतील प्रगतीपथावरील अपूर्ण कामे यासह मातीनाला बांध, मातीबांध, सिमेंट नालाबांध, ढाळीचे बांध, कम्पार्टमेंट बांध, जैविक बंधारा, खार जमिन विकास बंधारा, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, फळबाग लागवड, तुतीची लागवड, सिंचन विहिरी, सिंचन विहिरींची दुरुस्ती व गाळ काढणे, कालव्यांमधील गाळ हटविणे, सफाई, अस्तरीकरण व नुतनीकरण, पाटचर्‍या दुरुस्ती, मातीचे कालवे, नदी/नाला पुनरुज्जीवन यासह पांदन रस्ते, अंतर्गत रस्ते यासह उभारल्या जाणार्‍या इमारतींची कामे पूर्णत: बंद पडली आहेत. कामांमधील तांत्रिक बाबी तपासण्याची मुख्य जबाबदारी असणारे अभियंतेच कामावर पाय ठेवायला तयार नसल्यामुळे ह्यनरेगाह्णच्या यशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे आहे, त्या अधिकार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी ह्यनरेगाह्णच्या कामांकडे लक्ष देणे बंद केल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जलसंधारणाची कामे, सिंचन विहिरी, वृक्षलागवड यासह पांदन रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची कामे अचानक ठप्प झाली असून या कामांकडे सद्या मजूरही फिरकेनासा झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. शासनाने यासंदर्भात सुवर्णमध्य काढून रखडलेली तद्वतच बंद पडलेली कामे पुर्ववत सुरु करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.