शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

एनआरसी: कागदपत्रे सादर न करण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:37 IST

जनसभेमध्ये जमलेल्या मुस्लीम बांधवांनी ‘एनआरसी’ कायद्यासाठी कागदपत्रे सादर न करण्याची सामूहिक शपथ घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र शासनाने नागरिक त्व दुरुस्ती कायदा (सीएए) तसेच भारतातील अवैध रहिवाशांना ओळखून त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी लागू केलेल्या ‘एनआरसी’ कायद्याच्या विरोधात रविवारी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले. स्थानिक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित जनसभेमध्ये जमलेल्या मुस्लीम बांधवांनी ‘एनआरसी’ कायद्यासाठी कागदपत्रे सादर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. या विशालकाय जनसभेचे ‘तहफ्फुजे कानून-ए-शरियत कमिटी’च्यावतीने आयोजन करण्यात आले होते.केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘सीएए आणि एनआरसी’ कायद्याच्या विरोधात रविवारी मुस्लीम बांधवांनी रोष व्यक्त केला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध वाहनांद्वारे आलेल्या मुस्लीम बांधवांना ‘तहफ्फुजे कानून-ए-शरियत कमिटी’च्यावतीने आयोजित जनसभेत मार्गदर्शन करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मौलाना अब्दुल रशिद कारंजी-रिजवी यांनी उपस्थितांना संबोधित केले. या दोन्ही कायद्यांमुळे देशभरातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी केला.याप्रसंगी मौलाना सैयद जहीरुल इसलाम ऊर्फ जकीमियां नक्शबंदी, मौलाना सफदर कासमी, मौलाना अब्दुल जब्बार मजाहरी, मौलाना गुलाम मुस्तफा, कारी मकसूद अहमद, मुफ्ती गुफरान गाजी, मौलाना तुफैल नदवी, मुफ्ती मोहम्मद हुफैज, मौलाना अब्दुल वाहिद, सैयद शाहनवाज जुल्फुकारी यांच्यासह भन्ते अश्वजित थेरो, वजीर खान, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रदीप चोरे व फादर मार्क्स ए. खांडेकर उपस्थित होते.‘हम’मुळे देश तयार झालाय!‘हम’ या शब्दातील ‘ह’ म्हणजे हिंदू आणि ‘म’ म्हणजे मुसलमान, यांनी मिळून देश तयार झाला आहे. हा देश कोणत्या एका जाती-समूहाचा कदापि नव्हता आणि राहणार नाही. केंद्र शासनाच्या हिटलरशाहीमुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या देशाला अनावश्यक कायद्यांची गरज नसून, गरिबी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मौलाना सैयद जहीरुल इसलाम ऊर्फ जकीमियां नक्शबंदी यांनी सांगितले. या देशाचे मूळ निवासी असलेल्या मुस्लिमांना देश प्रेम सांगण्याची गरज नाही. आम्ही देशाप्रती बांधील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चौका-चौकांत व्हॉलेंटियर्स‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधात रविवारी अकोला क्रिकेट क्लब येथे जनसभा घेण्यात आली. हजारो मुस्लिमांनी येथे उपस्थिती दर्शविली. यावेळी कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी चौका-चौकांत व्हॉलेंटियर्सनी धुरा सांभाळली. वाहनधारकांना पर्यायी रस्त्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जनसभेत सहभागी लोकांना शांती आणि शिस्त पाळण्याचे आवाहन व्हॉलेंटियर्स यांनी केले.

सत्ता आज आहे उद्या नाही, याचे भान ठेवा!या देशात मुस्लीम आणि हिंदू समाजाने शांततेने राहावे, या उद्देशातून भारताची फाळणी झाली होती. विद्यमान कें द्र सरकार देशातील वातावरण गढूळ करीत आहे. आजपर्यंतही सर्वसामान्यांच्या खात्यात १५ लाख जमा झालेच नाही. नागरिकांचे लक्ष भरकटण्यासाठी केंद्र सरकार खेळी खेळत आहे. सत्ता आज आहे, उद्या नाही, याचे भान मोदी-शाह यांनी ठेवण्याची गरज असल्याचा सूचक इशारा मौलाना अब्दुल जब्बार मजाहरी यांनी यावेळी दिला.

ग्रामीण भागातील लोकांचाही सहभागनिषेध मोर्चात शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाज सहभागी झाला होता. यामध्ये वयोवृद्धांसह चिमुकल्यांचाही सहभाग होता.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक