शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:46 IST

अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे

- प्रवीण खेतेअकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे. ग्रामीण भागात ‘व्हीसीडीसी’ अकार्यक्षम ठरत असल्याने कुपोषण मुक्तीचा हा लढा तोकडा ठरत असून, राज्यभरात तालुकास्तरावर एनआरसी केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहेदुर्गम आणि आदिवासी भागासह शहरी भागातही कुपोषणाचे लोण पसरत आहे. यावर मात करण्यासाठी पोषण आहार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत जिल्हास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र आहे; मात्र रोजगार बुडवून येथे मुलांना ठेवणे ग्रामीण भागातील पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे पालकही या ठिकाणी येण्यास नकार दर्शवितात. ग्रामीण भागात ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’ म्हणजेच व्हीसीडीसी आहेत; मात्र त्यांचे कार्य प्रभावी नाही, अशा परिस्थितीत कुपोषणाचा लढा तोकडाच ठरत आहे. त्यामुळे किमान तालुकास्तरावरदेखील एनआरसी केंद्र आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.काय आहे ‘एनआरसी’ केंद्रकुपोषित बालकांना निगराणीत ठेवून त्यांना आवश्यक पोषण आहार देऊन या बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकासासाठी पोषण पुनर्वसन केंद्र राज्यात जिल्हास्तरावर कार्यरत आहे. यामध्ये कुपोषित बालकांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले जात असून, या कालावधीत कुपोषित बालकांच्या वजनात किमान १५ टक्क्यांची वाढ केली जाते. पोषण आहारासोबतच कुपोषित बालकांच्या बौद्धिक विकासासाठीही विविध प्रयत्न केले जातात.दुर्गम भागात ‘एनआरसी’ पोहोचलेच नाहीबहुतांश ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम भागात पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक ती माहिती पोहोचली नाही. शिवाय,राज्यभरात केवळ जिल्हास्तरावर एनआरसी आहे. त्यामुळे या ठिकाणी १४ दिवसांचा मुक्काम ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा नाही. म्हणूनच या ठिकाणी येण्यास पालकांचा नकार असतो. अनेकांसाठी गाव सोडून शहरात येणेही शक्य नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात.ग्रामीण स्तरावर प्रभावी उपाययोजनांची गरजशहरी भागात विशेष सुविधा आहे; मात्र त्या ग्रामीण भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे किमान तालुकास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक आहे. यासाठी शासनातर्फे प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.हे आहेत ‘एनआरसी’चे फायदे

  • बालकांचे वजन वाढण्यासाठी योग्य पोषण आहार
  • शारीरिक विकासासोबत बौद्धिक विकास
  • मातांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण

कुपोषण मुक्तीसाठी ‘एनआरसी’ची महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये बालकांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही विशेष लक्ष दिले जाते. या ठिकाणी प्रत्येक कुपोषित बालक पोहोचावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य