शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:46 IST

अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे

- प्रवीण खेतेअकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे. ग्रामीण भागात ‘व्हीसीडीसी’ अकार्यक्षम ठरत असल्याने कुपोषण मुक्तीचा हा लढा तोकडा ठरत असून, राज्यभरात तालुकास्तरावर एनआरसी केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहेदुर्गम आणि आदिवासी भागासह शहरी भागातही कुपोषणाचे लोण पसरत आहे. यावर मात करण्यासाठी पोषण आहार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत जिल्हास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र आहे; मात्र रोजगार बुडवून येथे मुलांना ठेवणे ग्रामीण भागातील पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे पालकही या ठिकाणी येण्यास नकार दर्शवितात. ग्रामीण भागात ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’ म्हणजेच व्हीसीडीसी आहेत; मात्र त्यांचे कार्य प्रभावी नाही, अशा परिस्थितीत कुपोषणाचा लढा तोकडाच ठरत आहे. त्यामुळे किमान तालुकास्तरावरदेखील एनआरसी केंद्र आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.काय आहे ‘एनआरसी’ केंद्रकुपोषित बालकांना निगराणीत ठेवून त्यांना आवश्यक पोषण आहार देऊन या बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकासासाठी पोषण पुनर्वसन केंद्र राज्यात जिल्हास्तरावर कार्यरत आहे. यामध्ये कुपोषित बालकांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले जात असून, या कालावधीत कुपोषित बालकांच्या वजनात किमान १५ टक्क्यांची वाढ केली जाते. पोषण आहारासोबतच कुपोषित बालकांच्या बौद्धिक विकासासाठीही विविध प्रयत्न केले जातात.दुर्गम भागात ‘एनआरसी’ पोहोचलेच नाहीबहुतांश ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम भागात पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक ती माहिती पोहोचली नाही. शिवाय,राज्यभरात केवळ जिल्हास्तरावर एनआरसी आहे. त्यामुळे या ठिकाणी १४ दिवसांचा मुक्काम ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा नाही. म्हणूनच या ठिकाणी येण्यास पालकांचा नकार असतो. अनेकांसाठी गाव सोडून शहरात येणेही शक्य नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात.ग्रामीण स्तरावर प्रभावी उपाययोजनांची गरजशहरी भागात विशेष सुविधा आहे; मात्र त्या ग्रामीण भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे किमान तालुकास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक आहे. यासाठी शासनातर्फे प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.हे आहेत ‘एनआरसी’चे फायदे

  • बालकांचे वजन वाढण्यासाठी योग्य पोषण आहार
  • शारीरिक विकासासोबत बौद्धिक विकास
  • मातांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण

कुपोषण मुक्तीसाठी ‘एनआरसी’ची महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये बालकांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही विशेष लक्ष दिले जाते. या ठिकाणी प्रत्येक कुपोषित बालक पोहोचावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य