शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:46 IST

अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे

- प्रवीण खेतेअकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे. ग्रामीण भागात ‘व्हीसीडीसी’ अकार्यक्षम ठरत असल्याने कुपोषण मुक्तीचा हा लढा तोकडा ठरत असून, राज्यभरात तालुकास्तरावर एनआरसी केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहेदुर्गम आणि आदिवासी भागासह शहरी भागातही कुपोषणाचे लोण पसरत आहे. यावर मात करण्यासाठी पोषण आहार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत जिल्हास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र आहे; मात्र रोजगार बुडवून येथे मुलांना ठेवणे ग्रामीण भागातील पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे पालकही या ठिकाणी येण्यास नकार दर्शवितात. ग्रामीण भागात ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’ म्हणजेच व्हीसीडीसी आहेत; मात्र त्यांचे कार्य प्रभावी नाही, अशा परिस्थितीत कुपोषणाचा लढा तोकडाच ठरत आहे. त्यामुळे किमान तालुकास्तरावरदेखील एनआरसी केंद्र आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.काय आहे ‘एनआरसी’ केंद्रकुपोषित बालकांना निगराणीत ठेवून त्यांना आवश्यक पोषण आहार देऊन या बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकासासाठी पोषण पुनर्वसन केंद्र राज्यात जिल्हास्तरावर कार्यरत आहे. यामध्ये कुपोषित बालकांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले जात असून, या कालावधीत कुपोषित बालकांच्या वजनात किमान १५ टक्क्यांची वाढ केली जाते. पोषण आहारासोबतच कुपोषित बालकांच्या बौद्धिक विकासासाठीही विविध प्रयत्न केले जातात.दुर्गम भागात ‘एनआरसी’ पोहोचलेच नाहीबहुतांश ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम भागात पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक ती माहिती पोहोचली नाही. शिवाय,राज्यभरात केवळ जिल्हास्तरावर एनआरसी आहे. त्यामुळे या ठिकाणी १४ दिवसांचा मुक्काम ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा नाही. म्हणूनच या ठिकाणी येण्यास पालकांचा नकार असतो. अनेकांसाठी गाव सोडून शहरात येणेही शक्य नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात.ग्रामीण स्तरावर प्रभावी उपाययोजनांची गरजशहरी भागात विशेष सुविधा आहे; मात्र त्या ग्रामीण भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे किमान तालुकास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक आहे. यासाठी शासनातर्फे प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.हे आहेत ‘एनआरसी’चे फायदे

  • बालकांचे वजन वाढण्यासाठी योग्य पोषण आहार
  • शारीरिक विकासासोबत बौद्धिक विकास
  • मातांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण

कुपोषण मुक्तीसाठी ‘एनआरसी’ची महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये बालकांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही विशेष लक्ष दिले जाते. या ठिकाणी प्रत्येक कुपोषित बालक पोहोचावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य