शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदाची संधी मिळणार!

By admin | Updated: May 22, 2017 01:30 IST

सहा वर्षांनंतर जिल्हाबाह्य होणार बदली

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : नगर परिषद कर्मचाऱ्यांना विभागांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट मुख्याधिकारी पदावर काम करण्याची संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी जिल्ह्यात, तर सहा वर्षांनंतर जिल्हाबाह्य बदली करण्यात येणार असून, त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार नगरविकास प्रशासन संचालकांना देण्यात आले आहेत. शासनाने नगरविकास प्रशासन संचालकांना बदल्याचे अधिकार दिले आहेत. कायद्याप्रमाणे प्रशासन चालण्यासाठी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या एका नगरपरिषदेत तीन वर्ष जिल्ह्यात सहा वर्षांची सेवा राहणार असल्याने अनेक सेवानिवृत्तीच्या मार्गावरील कर्मचाऱ्यांची जिल्हाबाह्य बदली होणार आहे. यातच शासनाने राज्यस्तरीय संवर्गातून मुख्याधिकारी श्रेणी २ (गट ब) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीची संधी दिली आहे. न. प. मुख्याधिकारी पदासाठी राज्यस्तरीय संवर्गात सात वर्ष नियमित सेवा, वय ४५ वर्षांपेक्षा कमी व पदवीधर असलेले कर्मचारी पात्र ठरणार आहेत. राज्यातील नगरपालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली स्थानिक पातळीवरच ठरून कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात होती. कर्मचाऱ्यातून अधिकारी झाल्यावर वर्षानुवर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी करणाऱ्यांना शासनाकडून चाप बसणार आहे. एकाच नगरपालिकेत तीन वर्ष काम केल्यानंतर जिल्ह्यात, तर सहा वर्ष नोकरी झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येणार आहे. दर तीन वर्षांनी दुसऱ्या नगरपरिषदेत बदली असल्याने पूर्वी लागलेल्या नगरपालिकेतच सेवानिवृत्ती हे धोरण बदलणार आहे. संवर्गातूनच पदोन्नतीने विभागीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करून कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी या उच्च पदावर काम करण्याची संधी शासनाने दिली आहे.