शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आता वर्ग १ ते १२ चा अभ्यासक्रम तयार करणार एकच समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 02:00 IST

अभ्यासक्रमात येणार सुसूत्रता.

विवेक चांदूरकर/ वाशिम : आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचा शालेय अभ्यासक्रम तीन वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. आता मात्र एकच समिती वर्ग एक ते बारापर्यंतचा अभ्यासक्रम तयार करणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यास मदत होणार आहे. राज्यात शालेय अभ्यासक्रम अभ्यास मंडळाच्यावतीने तयार करण्यात येतो. या अभ्यासक्रमात ठराविक कालावधीनंतर बदल करण्यात येतो. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम तयार करीत असताना किंवा अभ्यासक्रमात बदल करीत असताना आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. त्यामुळे पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पाचवीचा अभ्यासक्रम हा वेगळा असायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे दहावीनंतर अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम वेगळा राहत होता. त्यामुळे पुन्हा विद्यार्थी संभ्रमात पडत होते. त्यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्याकरिता आता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम एकच समिती गठीत करणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमात सुसूत्रता येणार असून, विद्यार्थ्यांना सलग शिक्षण घेणे सोपे होईल, तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही मदत होईल. आतापर्यंत प्राथमिक व माध्यमिकचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. आता मात्र वर्ग १ ते १२ पर्यंतच्या शिक्षणाकरिता एकच समिती तयार करण्यात आली असून, यात विविध तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती आपसामध्ये समन्वय ठेवून अभ्यासक्रम तयार करणार असल्याचे शिक्षण विभागाचे सचिव नंदकु मार यांनी सांगीतले.विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती अभ्यासक्रम तयार करण्याकरिता त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व तज्ज्ञांमध्ये समन्वय असणार आहे. या समन्वयातूनच सलग व मागील वर्गातील अभ्यासक्रमाशी निगडित अभ्यासक्रमच पुढील वर्गात दिला जाणार आहे.