शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

साहित्य संमेलनातील विचारमंथनावर आता कृतीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:50 IST

भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्‍या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्‍यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.

ठळक मुद्देसत्यपाल महाराज यांचे आवाहन राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचा समारोप

नीलिमा शिंगणे - जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:(स्व.श्रीरामजी भाकरे महाराज साहित्य नगरी) - अलीकडच्या काळात भंडारा देण्याची पद्धत फोफावली आहे. कार्य कोणतेही असो दिला भंडारा. एवढेच नव्हेतर सामाजिक आंदोलने यशस्वी करायचे असेल तरीही हल्ली लोकप्रतिनिधी भंडारा देतात. जेथे जेवण ते आंदोलन कधी फेल पडत नाही. मात्र, राष्ट्रसंतांच्या विचार साहित्य संमेलनात गर्दी होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्‍या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्‍यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्यावतीने आयोजित ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ला सर्मपित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन-२0१७ च्या समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून सत्यपाल महाराज बोलत होते. दोन दिवसीय या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. यावेळीविचारपीठावर स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कृष्णा अंधारे, प्रमुख मार्गदर्शक गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरू ळकर गुरुजी, आजीवन प्रचारक डॉ.भास्करराव विघे तसेच माजी मंत्री गुलाबराव गावंडे, उद्योजक गंगाधर पाटील, महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अँड.  मोतिसिंह मोहता, ज्ञानेश्‍वर साखरकर विराजमान होते. सत्यपाल महाराज यांनी नेहमीच्याच परखड शैलीत चुकीच्या प्रथा परंपरावर आसूड ओढत, शेतकरी जगला तर देश जगेल हे केवळ शब्दांपुरते र्मयादीत ठेवू नका, शेतकर्‍यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल, आत्महत्या थांबतील अशा विचारांची कृतीची गरज असल्याचे प्रतिपादीत केले. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी सांगितले, की सत्ता आणि सत्य जेव्हा जवळ येईल, तेव्हाच देशाची प्रगती होईल. समाज जागृत आहे, पण शासन जागृत नाही.  असा आरोप केला.  कृष्णा अंधारे यांनी सरकार कुठलेही असो शेतकर्‍यांचे शोषण पूर्वीपासूनच होत आहे. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे सिलिंग कायदा. यामुळे अनेक सधन शेतकरी आज भूमिहिन झाले असल्याची खंत व्यक्त केली.  भास्करराव विधे यांनी राष्ट्रसंतांचा विचार पूर्ण झाला, असे अजिबात नाही. फक्त त्यांच्या साहित्यातील काही मोतीच याठिकाणी सापडलेत. सागर रिकामा झाला नाही, असे  प्रतिपादन केले.  साहित्य संमेलनाला महाराजांच्या श्रद्धेने आणि विचारांनी पेटलेली माणसेचं आलेली आहेत. ग्रामगीतेचा विचार हा प्रयोगशील आहे. केवळ ग्रामगीतेला किंवा तुकडोजी महाराजांना मी मानतो, असे मानण्याने ज्ञान मिळत नाही, तर ती समजून घेण्याने ज्ञान मिळत असते, असे ज्ञानेश्‍वर साखरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर