शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनातील विचारमंथनावर आता कृतीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:50 IST

भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्‍या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्‍यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.

ठळक मुद्देसत्यपाल महाराज यांचे आवाहन राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचा समारोप

नीलिमा शिंगणे - जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:(स्व.श्रीरामजी भाकरे महाराज साहित्य नगरी) - अलीकडच्या काळात भंडारा देण्याची पद्धत फोफावली आहे. कार्य कोणतेही असो दिला भंडारा. एवढेच नव्हेतर सामाजिक आंदोलने यशस्वी करायचे असेल तरीही हल्ली लोकप्रतिनिधी भंडारा देतात. जेथे जेवण ते आंदोलन कधी फेल पडत नाही. मात्र, राष्ट्रसंतांच्या विचार साहित्य संमेलनात गर्दी होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्‍या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्‍यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्यावतीने आयोजित ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ला सर्मपित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन-२0१७ च्या समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून सत्यपाल महाराज बोलत होते. दोन दिवसीय या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. यावेळीविचारपीठावर स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कृष्णा अंधारे, प्रमुख मार्गदर्शक गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरू ळकर गुरुजी, आजीवन प्रचारक डॉ.भास्करराव विघे तसेच माजी मंत्री गुलाबराव गावंडे, उद्योजक गंगाधर पाटील, महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अँड.  मोतिसिंह मोहता, ज्ञानेश्‍वर साखरकर विराजमान होते. सत्यपाल महाराज यांनी नेहमीच्याच परखड शैलीत चुकीच्या प्रथा परंपरावर आसूड ओढत, शेतकरी जगला तर देश जगेल हे केवळ शब्दांपुरते र्मयादीत ठेवू नका, शेतकर्‍यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल, आत्महत्या थांबतील अशा विचारांची कृतीची गरज असल्याचे प्रतिपादीत केले. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी सांगितले, की सत्ता आणि सत्य जेव्हा जवळ येईल, तेव्हाच देशाची प्रगती होईल. समाज जागृत आहे, पण शासन जागृत नाही.  असा आरोप केला.  कृष्णा अंधारे यांनी सरकार कुठलेही असो शेतकर्‍यांचे शोषण पूर्वीपासूनच होत आहे. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे सिलिंग कायदा. यामुळे अनेक सधन शेतकरी आज भूमिहिन झाले असल्याची खंत व्यक्त केली.  भास्करराव विधे यांनी राष्ट्रसंतांचा विचार पूर्ण झाला, असे अजिबात नाही. फक्त त्यांच्या साहित्यातील काही मोतीच याठिकाणी सापडलेत. सागर रिकामा झाला नाही, असे  प्रतिपादन केले.  साहित्य संमेलनाला महाराजांच्या श्रद्धेने आणि विचारांनी पेटलेली माणसेचं आलेली आहेत. ग्रामगीतेचा विचार हा प्रयोगशील आहे. केवळ ग्रामगीतेला किंवा तुकडोजी महाराजांना मी मानतो, असे मानण्याने ज्ञान मिळत नाही, तर ती समजून घेण्याने ज्ञान मिळत असते, असे ज्ञानेश्‍वर साखरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर