शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आता महात्मा फुले जनआरोग्य योजना

By admin | Updated: April 24, 2017 01:56 IST

विद्यमान योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ : जिल्ह्यात १ एप्रिलपासून योजना लागू

अकोला: सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नामकरण आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने दरम्यानच्या काळात लाभार्थींच्या विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी योजना १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू ठेवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजीव गांधी जीवदायी आरोग्य योजना राज्यात २ जुले २०१२ रोजी आठ जिल्ह्यात सुरू झाली होती. त्यानंतर उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू करण्यात आली. शेवटच्या घटकापर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेसाठी एक लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब पात्र आहेत. या योजनेत पात्र लाभार्थींसाठी निवडलेल्या ९७१ आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यासाठी राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय व खासगी रुग्णालये अंगीकृत करण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्र शासन विमा हप्ता भरत असल्यामुळे निवडक आजारांसाठी पात्र लाभार्थींना निवडक रुग्णालयांमध्ये कोणतीही रक्कम न देता उपचार घेता येतात. दरम्यान, १ एप्रिल २०१७ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना ही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य या नावाने राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तथापि, सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यानच्या काळात काळात लाभार्थींच्या विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी योजना १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू राहणार आहे. त्यानंतर ही योजना संपूर्णपणे नव्या रूपात अस्तित्वात येणार आहे. जिल्ह्यात १५ रुग्णालये अंगीकृतराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून अकोला जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २ शासकीय व १३ खासगी अशी एकूण १५ रुग्णालये अंगीकृत केली आहेत. आतापर्यंत १२,५८४ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी ४० कोटी ९३ लाख ३४ हजार ८८ रुपये मंजूर झाले आहेत.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलल्याने ती आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या नावाने ओळखली जाईल. योजनेचे स्वरूप मात्र कायम आहे. पात्र लाभार्थींनी या योजनेची योग्य माहिती घेऊन तिचा लाभ घ्यावा. - डॉ. सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक अधिकारी, अकोला