शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आता विकासाच्या राजकारणाची अपेक्षा!

By admin | Updated: October 27, 2014 01:21 IST

अकोला जिल्ह्यातील राजकारण विकासके द्री करण्याची अपेक्षा.

अकोला : जिल्ह्यातील राजकारण जाती-पातीवर टिकून आहे. जाती-पातीच्या राजकारणा तून बाहेर न पडू शकलेल्या येथील लोकप्रतिनिधींना विकासाची गंगा मुंबई, दिल्लीतून अकोल्यापर्यंत आणण्यात नेहमीच अपयश आले. आतापर्यंत राज्यात, दिल्लीत विरोधकांचे राज्य असल्याची सबब येथील लोकप्रतिनिधी देत होते. ज्यांची सत्ता त्यांच्या आमदार, खासदारांना मुंबई, दिल्लीत झुकते माप मिळते, यात कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे अकोल्या तील जनतेने येथील लोकप्रतिनिधींच्या शब्दावर विश्‍वास ठेवत भाजपच्या उमेदवाराला पुन्हा दिल्लीत पाठविले. त्यापाठोपाठ पाचपैकी चार आमदारही मुंबईला पाठविले. अकोला पश्‍चिममधून भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्यावर पाचव्यांदा मतदारांनी संपूर्ण विश्‍वास दर्शविला. दिग्गज उमेदवारांच्या लढतीत त्यांनी बाजी मारली. मूर्तिजापूरमध्येसुद्धा भाजपने गड राखला. हरीश पिंपळे यांच्यावरच मूर्तिजापूर-बाश्रीटाकळीतील मतदारांनी विश्‍वास दर्शविला. आकोटमधून प्रकाश भारसाकळे आणि अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर या भाजप उमेदवारांना अकोला जिल्ह्यातील उमेदवारांनी विधानसभेवर पाठविले. भारसाकळे जिल्ह्यातून प्रथमच निवडून आले असले तरी त्यांच्या पाठीशी यापूर्वी चारवेळा आमदार होण्याचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी नवे असले तरी मुंबई त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यामुळे आ. शर्मा यांच्यासोबतच आ. भारसाकळे यांच्यासारखे अनुभवी लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाले आहेत. दुसर्‍यांदा विधानसभेत पोहोचलेले हरीश पिंपळे यांचा अनुभवही जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यास सहायक ठरणार आहे. या अनुभवी लोकप्र ितनिधींसोबत प्रथमच मुंबई गाठणारे रणधीर सावरकर यांचा भाजप पक्ष संघटनेत असलेला वट बघता त्यांच्याकडूनही जनतेला विकासाची अपेक्षा राहील.