शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

‘आदर्श गाव’ पुरस्कारासाठी आता स्वच्छ पांदण रस्त्यांची अट!

By admin | Updated: July 26, 2016 01:51 IST

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हगणदरीमुक्त रस्ते

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून गाव परिसरातील पांदण रस्ते हगणदरीमुक्त व स्वच्छ झाल्याशिवाय त्या गावास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेता येणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती दिली होती. याबाबत अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्रिमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर येत्या २ ऑक्टोबरपासून अभियानाची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. हगणदरीमुक्त रस्त्यासह गावातील सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतरच ग्राम स्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. शासनाच्या या निर्णयामुळे गाव शिवारातील रस्ते हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल. तसेच पांदण रस्त्यांचेही रूप यामुळे बदलण्यास मदत होईल. पुरस्काराच्या रकमेतही वाढ!ग्राम स्वच्छता अभियानात चांगले काम करणार्‍या गावांच्या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तर तृतीय १0 हजार, अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५0 हजार रुपये, तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत.