शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

‘आदर्श गाव’ पुरस्कारासाठी आता स्वच्छ पांदण रस्त्यांची अट!

By admin | Updated: July 26, 2016 01:51 IST

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हगणदरीमुक्त रस्ते

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून गाव परिसरातील पांदण रस्ते हगणदरीमुक्त व स्वच्छ झाल्याशिवाय त्या गावास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेता येणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती दिली होती. याबाबत अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्रिमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर येत्या २ ऑक्टोबरपासून अभियानाची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. हगणदरीमुक्त रस्त्यासह गावातील सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतरच ग्राम स्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. शासनाच्या या निर्णयामुळे गाव शिवारातील रस्ते हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल. तसेच पांदण रस्त्यांचेही रूप यामुळे बदलण्यास मदत होईल. पुरस्काराच्या रकमेतही वाढ!ग्राम स्वच्छता अभियानात चांगले काम करणार्‍या गावांच्या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तर तृतीय १0 हजार, अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५0 हजार रुपये, तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत.