शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

‘आदर्श गाव’ पुरस्कारासाठी आता स्वच्छ पांदण रस्त्यांची अट!

By admin | Updated: July 26, 2016 01:51 IST

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हगणदरीमुक्त रस्ते

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून गाव परिसरातील पांदण रस्ते हगणदरीमुक्त व स्वच्छ झाल्याशिवाय त्या गावास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेता येणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती दिली होती. याबाबत अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्रिमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर येत्या २ ऑक्टोबरपासून अभियानाची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. हगणदरीमुक्त रस्त्यासह गावातील सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतरच ग्राम स्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. शासनाच्या या निर्णयामुळे गाव शिवारातील रस्ते हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल. तसेच पांदण रस्त्यांचेही रूप यामुळे बदलण्यास मदत होईल. पुरस्काराच्या रकमेतही वाढ!ग्राम स्वच्छता अभियानात चांगले काम करणार्‍या गावांच्या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तर तृतीय १0 हजार, अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५0 हजार रुपये, तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत.