शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

महापालिका हद्दवाढीची अधिसूचना आठवडाभरात

By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST

अकोला शहराची प्रस्तावित हद्दवाढीच्या अधिसुचनेवर मुख्यमंत्री करणार लवकरच स्वाक्षरी.

आशीष गावंडे /अकोलामहापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे. आठवडाभरात हद्दवाढीची प्राथमिक अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती मंगळवारी मंत्रालयातील विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच हद्दवाढीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.महापालिकेच्या वतीने अकोलेकरांना उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत आहे. अकोला मनपाची २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे अपेक्षित होते. लालफीतशाहीमुळे ही प्रक्रिया १५ वर्षांपासून थंड बस्त्यात होती. मनपा प्रशासनाने हद्दवाढीचा पहिला प्रशासकीय प्रस्ताव २00२ मध्ये शासनाकडे सादर केला होता. सुरुवातीला यामध्ये मनपा क्षेत्रालगतच्या सुमारे २१ गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावित होते. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव तयार केल्यानंतर २४ गावांचा समावेश करण्यात आला. आयुक्तांचा पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक भूमिकेमुळे हद्दवाढीच्या प्रस्तावाला गती मिळाली. शहराची हद्दवाढ झाल्यास मालमत्तांच्या संख्येत वाढ होऊन त्यापासून मनपाला महसूल प्राप्त होऊ शकतो. आयुक्त लहाने यांनी शहरालगतच्या गावांचे नकाशे, शहराला जोडल्या जाणार्‍या सीमारेषा, गावांतील लोक संख्या, त्यांचे दरडोई उत्पन्न आदी इत्थंभूत बाबींचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात नगर विकास विभागाकडे सादर केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी १ मार्च रोजी मंजुरी दिली. दहा महिन्यानंतर राज्यात महापालिका निवडणुकीचा सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्या पृष्ठभूमीवर हद्दवाढीच्या हालचालींना वेग आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी हद्दवाढीची फाइल भाषा संचालनालयाकडून नगर विकास विभागाला प्राप्त झाली आहे. आठवडाभरात हद्दवाढीची अधिसूचना जारी होणार असून, येत्या दोन दिवसात यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणार असल्याची माहिती आहे.गावांमध्ये सुविधाच नाहीत!मनपा क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या गावांमध्ये प्राथमिक सुविधांची पुरती ऐशीतैशी झाली आहे. भौरद, डाबकी, शिलोडा, शिवणी, शिवापूर, मलकापूर, खडकीसह इतर गावांमध्ये चक्क आठ ते दहा फूट रुंदीचे मुख्य रस्ते आहेत. अरुंद रस्ते, ले-आऊट नसल्याने सांडपाण्याची समस्या व प्रामुख्याने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामसेवक, सरपंचांसोबत हातमिळवणी करीत मनमानी पद्धतीने इमारती उभारल्या आहेत. काही राजकारण्यांच्या अट्टहासामुळे ग्रामीण भागात विकास कामांना 'ब्रेक' लागल्याचे चित्र आहे.