शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

खतांच्या बफर स्टॉकचे नियोजनच नाही!

By admin | Updated: May 15, 2015 01:35 IST

अमरावती विभागात ६ लाख मेट्रिक टन खतसाठा मंजूर.

संतोष येलकर / अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात खतांची मागणी आणि त्या तुलनेत जिल्हानिहाय करावयाचा पुरवठा, यासंदर्भात राज्याच्या कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले असले तरी, तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी खतांच्या संरक्षित साठय़ाचे (बफर स्टॉक) नियोजनच कृषी विभागामार्फत करण्यात आले नाही. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. काळाबाजार रोखण्यासाठी या व्यतिरिक्त संरक्षित खतसाठा निश्‍चित करणे गरजेचे होते. दरवर्षी खरीप हंगामात प्रत्येक जिल्ह्यात लागणार्‍या खतांची मागणी विचारात घेता, खतपुरवठय़ाचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येते. या नियोजनात जिल्हानिहाय संरक्षित खतसाठादेखील निश्‍चित करण्यात येत होता. खरीप हंगामात मागणीच्या तुलनेत खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या कालावधीत जिल्हा स्तरावर करण्यात आलेला खतांचा संरक्षित साठा विक्रीसाठी मुक्त करण्यात येत होता. त्यामुळे तुटवड्याच्या कालावधीतही शेतकर्‍यांना खते उपलब्ध करुन देण्याच्या अडचणीवर मात करता येत होती. त्यासोबतच खत विक्रीच्या काळाबाजारावरही नियंत्रण ठेवल्या जात होते. यावर्षीच्या खरीप हंगामात खतांची मागणी आणि त्या तुलनेत जिल्हानिहाय खतांचे आवंटन राज्याच्या कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आले असले तरी, त्यामध्ये संरक्षित खतसाठा निश्‍चित करण्यात आला नाही. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ६ लाख ७२ हजार २६१ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन खतसाठय़ाचे आवंटन कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आले आहे. खतसाठय़ाचे आवंटन मंजूर करण्यात आले असले तरी, निर्माण होणार्‍या तुटवड्याच्या कालावधीत शेतकर्‍यांसाठी उपयोगी पडणार्‍या संरक्षित खतसाठय़ाचे जिल्हा नियोजन मात्र करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हानिहाय संरक्षित खतसाठा निश्‍चित करण्यात आला नाही.