शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या बफर स्टॉकचे नियोजनच नाही!

By admin | Updated: May 15, 2015 01:35 IST

अमरावती विभागात ६ लाख मेट्रिक टन खतसाठा मंजूर.

संतोष येलकर / अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात खतांची मागणी आणि त्या तुलनेत जिल्हानिहाय करावयाचा पुरवठा, यासंदर्भात राज्याच्या कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले असले तरी, तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी खतांच्या संरक्षित साठय़ाचे (बफर स्टॉक) नियोजनच कृषी विभागामार्फत करण्यात आले नाही. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. काळाबाजार रोखण्यासाठी या व्यतिरिक्त संरक्षित खतसाठा निश्‍चित करणे गरजेचे होते. दरवर्षी खरीप हंगामात प्रत्येक जिल्ह्यात लागणार्‍या खतांची मागणी विचारात घेता, खतपुरवठय़ाचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येते. या नियोजनात जिल्हानिहाय संरक्षित खतसाठादेखील निश्‍चित करण्यात येत होता. खरीप हंगामात मागणीच्या तुलनेत खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या कालावधीत जिल्हा स्तरावर करण्यात आलेला खतांचा संरक्षित साठा विक्रीसाठी मुक्त करण्यात येत होता. त्यामुळे तुटवड्याच्या कालावधीतही शेतकर्‍यांना खते उपलब्ध करुन देण्याच्या अडचणीवर मात करता येत होती. त्यासोबतच खत विक्रीच्या काळाबाजारावरही नियंत्रण ठेवल्या जात होते. यावर्षीच्या खरीप हंगामात खतांची मागणी आणि त्या तुलनेत जिल्हानिहाय खतांचे आवंटन राज्याच्या कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आले असले तरी, त्यामध्ये संरक्षित खतसाठा निश्‍चित करण्यात आला नाही. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ६ लाख ७२ हजार २६१ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन खतसाठय़ाचे आवंटन कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आले आहे. खतसाठय़ाचे आवंटन मंजूर करण्यात आले असले तरी, निर्माण होणार्‍या तुटवड्याच्या कालावधीत शेतकर्‍यांसाठी उपयोगी पडणार्‍या संरक्षित खतसाठय़ाचे जिल्हा नियोजन मात्र करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हानिहाय संरक्षित खतसाठा निश्‍चित करण्यात आला नाही.