शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

कालवा नव्हे, हा आहे अकोल्यातील भूयारी मार्ग....

By atul.jaiswal | Updated: March 14, 2023 17:54 IST

शहरातील गजबजलेल्या महात्मा गांधी मार्ग व मध्यवर्ती बसस्थानकासमाेरच्या चौकातील वर्दळ कमी व्हावी या हेतूने गत वर्षी बांधण्यात आलेला भूयारी मार्ग उद्घाटनापासूनच समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

अकोला- शहरातील गजबजलेल्या महात्मा गांधी मार्ग व मध्यवर्ती बसस्थानकासमाेरच्या चौकातील वर्दळ कमी व्हावी या हेतूने गत वर्षी बांधण्यात आलेला भूयारी मार्ग उद्घाटनापासूनच समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. कधी या भूयारी मार्गाचे दिवे बंद असतात, तर कधी पाणी साचलेले असते. मंगळवारी या भूयारी मार्गात पुन्हा पाणी साचले असून, साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना चालकांना अशी कसरत करावी लागत आहे.

अकोला शहरातील महात्मा गांधी मार्ग ते जनता भाजी बाजारपर्यंत  जवळपास ३०० मिटर लांबीचा भूयारी मार्ग बांधण्यात आला आहे. गतवर्षी शहरातील दोन उड्डाणपुलांसोबतच या भूयारी मार्गाचेही लोकार्पण करण्यात आले. नव्याची नवलाई म्हणून अकोलेकरांनी या भूयारी मार्गामधून येण्या-जाण्याची हौस भागवून घेतली. आता मात्र या भूयारी मार्गाची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.

प्रकाशाची व्यवस्था म्हणून बसविण्यात आलेले दिवे अनेकदा बंद असतात.  सर्व दिवे बंद असल्याने दिवसाही मोठा अंधार असतो. त्यामुळे दिवसाही या अंडरपासमधून वाहन नेण्यास भीती वाटते. झिरपणाऱ्या पाण्यामुळे भींती शेवाळल्या आहेत.  याशिवाय मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही पसरलेली आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भुयारी मार्गात वारंवार पाणी साचते. कायमस्वरुपी उपाययोजना न करता पाण्याचा उपसा करून मार्ग मोकळा केला जातो. गत दोन दिवसांपासून पुन्हा या भूयारी मार्गात पाणी साचले आहे. परिणामी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.