शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

असहकार्य, शिवीगाळ केल्यानंतरही ‘तिने’ निभावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

आशिष गावंडे/अकोला सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते. सर्वसामान्यांप्रमाणेच ...

आशिष गावंडे/अकोला

सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते.

सर्वसामान्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असणाऱ्या प्रभागात नागरिकांची शिवीगाळ, धाकदपट व असहकार्याची भूमिका सहन करीत मनपातील अधिपरिचारिका रेश्मा शामराव बिकट या निमूटपणे अविरत कर्तव्य निभावत होत्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच रजा न घेता त्यांनी कित्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाना रुग्णालयात दाखल करीत त्यांना जीवदान दिले.

महापालिकेत नागरी आरोग्य केंद्रामार्फत २०१८ मध्ये कंत्राटी तत्त्वावर रेश्मा बिकट यांची अधिपरिचारिका पदासाठी नियुक्ती करण्यात आली. शहरालगत सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारलिंगा गावातून दररोज दुचाकीने त्यांचे कर्तव्य निभावणे सुरू होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केले. सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाबद्दल अनेक गैरसमज, भीती व धास्तीचे वातावरण होते. अशा स्थितीत ७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि अकोलेकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यानंतर प्रभाग २ मधील अकोटफाईल परिसरात रुग्ण आढळून आले. त्यावेळी कोरोना विषाणूवर लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंकाकुशंका होत्या. अशा वातावरणात रुग्णाच्या अतिसंपर्कातील व हायरिस्कमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी अधिपरिचारिका रेश्मा बिकट सेवारत होत्या. उत्तर झोनमधील अनेक भागात मनपाच्या वैद्यकीय पथकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

रुग्णांची केली मनधरणी!

कोरोनाची बाधा झालेल्या व हायरिस्कमधील नागरिकांना कोविड चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागल्याचे रेश्मा यांनी सांगितले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची मनधरणी केल्याचे त्या सांगतात. वाहनात चढल्यानंतर अनेक रुग्ण भीतीपोटी वाहनातून पळ काढत होते.

कोरोनाबद्दल कुटुंबीयांत धास्ती

त्यावेळी घरी पोहोचताना रात्र होत असे. गावात कोरोनाबद्दल अनेक गैरसमज असल्याने सासरकडील मंडळीतही धास्ती होती. अघोळ केल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर जेवण तयार करीत होती. त्यावेळी नातेवाईकांकडून अनेकदा मान-अपमान सहन करावा लागला. नंतर पतीकडून सहकार्य मिळाल्याचे रेश्मा गर्वाने सांगतात.