शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

असहकार्य, शिवीगाळ केल्यानंतरही ‘तिने’ निभावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

आशिष गावंडे/अकोला सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते. सर्वसामान्यांप्रमाणेच ...

आशिष गावंडे/अकोला

सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते.

सर्वसामान्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असणाऱ्या प्रभागात नागरिकांची शिवीगाळ, धाकदपट व असहकार्याची भूमिका सहन करीत मनपातील अधिपरिचारिका रेश्मा शामराव बिकट या निमूटपणे अविरत कर्तव्य निभावत होत्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच रजा न घेता त्यांनी कित्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाना रुग्णालयात दाखल करीत त्यांना जीवदान दिले.

महापालिकेत नागरी आरोग्य केंद्रामार्फत २०१८ मध्ये कंत्राटी तत्त्वावर रेश्मा बिकट यांची अधिपरिचारिका पदासाठी नियुक्ती करण्यात आली. शहरालगत सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारलिंगा गावातून दररोज दुचाकीने त्यांचे कर्तव्य निभावणे सुरू होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केले. सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाबद्दल अनेक गैरसमज, भीती व धास्तीचे वातावरण होते. अशा स्थितीत ७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि अकोलेकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यानंतर प्रभाग २ मधील अकोटफाईल परिसरात रुग्ण आढळून आले. त्यावेळी कोरोना विषाणूवर लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंकाकुशंका होत्या. अशा वातावरणात रुग्णाच्या अतिसंपर्कातील व हायरिस्कमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी अधिपरिचारिका रेश्मा बिकट सेवारत होत्या. उत्तर झोनमधील अनेक भागात मनपाच्या वैद्यकीय पथकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

रुग्णांची केली मनधरणी!

कोरोनाची बाधा झालेल्या व हायरिस्कमधील नागरिकांना कोविड चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागल्याचे रेश्मा यांनी सांगितले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची मनधरणी केल्याचे त्या सांगतात. वाहनात चढल्यानंतर अनेक रुग्ण भीतीपोटी वाहनातून पळ काढत होते.

कोरोनाबद्दल कुटुंबीयांत धास्ती

त्यावेळी घरी पोहोचताना रात्र होत असे. गावात कोरोनाबद्दल अनेक गैरसमज असल्याने सासरकडील मंडळीतही धास्ती होती. अघोळ केल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर जेवण तयार करीत होती. त्यावेळी नातेवाईकांकडून अनेकदा मान-अपमान सहन करावा लागला. नंतर पतीकडून सहकार्य मिळाल्याचे रेश्मा गर्वाने सांगतात.