शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

असहकार्य, शिवीगाळ केल्यानंतरही ‘तिने’ निभावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

आशिष गावंडे/अकोला सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते. सर्वसामान्यांप्रमाणेच ...

आशिष गावंडे/अकोला

सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते.

सर्वसामान्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असणाऱ्या प्रभागात नागरिकांची शिवीगाळ, धाकदपट व असहकार्याची भूमिका सहन करीत मनपातील अधिपरिचारिका रेश्मा शामराव बिकट या निमूटपणे अविरत कर्तव्य निभावत होत्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच रजा न घेता त्यांनी कित्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाना रुग्णालयात दाखल करीत त्यांना जीवदान दिले.

महापालिकेत नागरी आरोग्य केंद्रामार्फत २०१८ मध्ये कंत्राटी तत्त्वावर रेश्मा बिकट यांची अधिपरिचारिका पदासाठी नियुक्ती करण्यात आली. शहरालगत सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारलिंगा गावातून दररोज दुचाकीने त्यांचे कर्तव्य निभावणे सुरू होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केले. सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाबद्दल अनेक गैरसमज, भीती व धास्तीचे वातावरण होते. अशा स्थितीत ७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि अकोलेकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यानंतर प्रभाग २ मधील अकोटफाईल परिसरात रुग्ण आढळून आले. त्यावेळी कोरोना विषाणूवर लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंकाकुशंका होत्या. अशा वातावरणात रुग्णाच्या अतिसंपर्कातील व हायरिस्कमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी अधिपरिचारिका रेश्मा बिकट सेवारत होत्या. उत्तर झोनमधील अनेक भागात मनपाच्या वैद्यकीय पथकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

रुग्णांची केली मनधरणी!

कोरोनाची बाधा झालेल्या व हायरिस्कमधील नागरिकांना कोविड चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागल्याचे रेश्मा यांनी सांगितले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची मनधरणी केल्याचे त्या सांगतात. वाहनात चढल्यानंतर अनेक रुग्ण भीतीपोटी वाहनातून पळ काढत होते.

कोरोनाबद्दल कुटुंबीयांत धास्ती

त्यावेळी घरी पोहोचताना रात्र होत असे. गावात कोरोनाबद्दल अनेक गैरसमज असल्याने सासरकडील मंडळीतही धास्ती होती. अघोळ केल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर जेवण तयार करीत होती. त्यावेळी नातेवाईकांकडून अनेकदा मान-अपमान सहन करावा लागला. नंतर पतीकडून सहकार्य मिळाल्याचे रेश्मा गर्वाने सांगतात.