शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

असहकार्य, शिवीगाळ केल्यानंतरही ‘तिने’ निभावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

आशिष गावंडे/अकोला सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते. सर्वसामान्यांप्रमाणेच ...

आशिष गावंडे/अकोला

सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते.

सर्वसामान्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असणाऱ्या प्रभागात नागरिकांची शिवीगाळ, धाकदपट व असहकार्याची भूमिका सहन करीत मनपातील अधिपरिचारिका रेश्मा शामराव बिकट या निमूटपणे अविरत कर्तव्य निभावत होत्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच रजा न घेता त्यांनी कित्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाना रुग्णालयात दाखल करीत त्यांना जीवदान दिले.

महापालिकेत नागरी आरोग्य केंद्रामार्फत २०१८ मध्ये कंत्राटी तत्त्वावर रेश्मा बिकट यांची अधिपरिचारिका पदासाठी नियुक्ती करण्यात आली. शहरालगत सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारलिंगा गावातून दररोज दुचाकीने त्यांचे कर्तव्य निभावणे सुरू होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केले. सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाबद्दल अनेक गैरसमज, भीती व धास्तीचे वातावरण होते. अशा स्थितीत ७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि अकोलेकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यानंतर प्रभाग २ मधील अकोटफाईल परिसरात रुग्ण आढळून आले. त्यावेळी कोरोना विषाणूवर लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंकाकुशंका होत्या. अशा वातावरणात रुग्णाच्या अतिसंपर्कातील व हायरिस्कमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी अधिपरिचारिका रेश्मा बिकट सेवारत होत्या. उत्तर झोनमधील अनेक भागात मनपाच्या वैद्यकीय पथकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

रुग्णांची केली मनधरणी!

कोरोनाची बाधा झालेल्या व हायरिस्कमधील नागरिकांना कोविड चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागल्याचे रेश्मा यांनी सांगितले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची मनधरणी केल्याचे त्या सांगतात. वाहनात चढल्यानंतर अनेक रुग्ण भीतीपोटी वाहनातून पळ काढत होते.

कोरोनाबद्दल कुटुंबीयांत धास्ती

त्यावेळी घरी पोहोचताना रात्र होत असे. गावात कोरोनाबद्दल अनेक गैरसमज असल्याने सासरकडील मंडळीतही धास्ती होती. अघोळ केल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर जेवण तयार करीत होती. त्यावेळी नातेवाईकांकडून अनेकदा मान-अपमान सहन करावा लागला. नंतर पतीकडून सहकार्य मिळाल्याचे रेश्मा गर्वाने सांगतात.