शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अपारंपरिक ऊर्जा योजनेस आयोगाने फासला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 14:05 IST

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नव्या प्रस्तावानुसार नेट मीटरिंग फक्त घरगुती ग्राहकांना लागू राहणार आहे.

अकोला : केंद्र सरकारने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस चालना देणारे नियम केले असून, त्यासाठी समाजातील युवकांना प्रेरणा देऊन पुढे आणले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने तयार केलेल्या नव्या प्रस्तावामुळे सौर ऊर्जा वीज निर्मिती निर्बंध लादला गेला आहे. यातून वीज निर्मिती होणे तर दूर युवकांच्या हातातील आहे तो रोजगारही बंद पडणार असल्याने रोष व्यक्त होत आहे.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नव्या प्रस्तावानुसार नेट मीटरिंग फक्त घरगुती ग्राहकांना लागू राहणार आहे. त्यातही पहिले ३०० युनिट जे सौर ऊर्जा प्रणालीतून तयार झाले असतील, ते वजा करण्यात येतील. उर्वरित युनिट फक्त ३.६४ या दराने महावितरण खरेदी करेल. याउलट ग्राहकाला विद्युत्त बिल देताना ८ रुपयांपेक्षा जास्त दराने आकारणी होईल. व्यावसायिक ग्राहकांना तर ३.६४ रुपयांनी वीज विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सौर ऊर्जा प्रणालीत सद्यस्थितीत करावी लागणारी गुंतवणूक लक्षात घेता ३.६४ रुपये हा दर व्यावहारिक ठरत नाही. परिणामी, गत काही वर्षांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराकडे वळत असलेले ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या धोरणामुळे स्वयंरोजगारासाठी निघालेल्या युवकांना जबर आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यानुषंगाने नुकतीच अकोल्यात सौर ऊर्जा उपकरण विक्रेते व ग्राहकांची बैठक पार पडली. त्यात वीज ग्राहकांवर होणारे परिणाम व आर्थिक मंदीत आयोगाने ओढवून घेतलेल्या संकटावर मंथन झाले. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष मोहनराव गंगाखेडकर, मंजित देशमुख, हेमंत जकाते, प्रदीप मालानी, योगेश बियाणी, श्रीवल्लभ पुसेगावकर, श्रीकांत पिंजरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच आंदोलन छेडण्याचा विचार येथे समोर आला.

टॅग्स :Akolaअकोला