शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाण्याचा पत्ता नाही, तरीही देयक वाटपाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 15:09 IST

पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देहरातील मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ५४ हजार असली, तरी त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन व मीटर लावले आहेत. नळाला मीटर लावल्यास दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मीटर रिडिंग न घेताच संबंधित मालमत्ताधारकांना देयक अदा करण्याचा अफलातून प्रकार होत आहे.

अकोला : शहरवासीयांना दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगत मनपा प्रशासनाने नळाला मीटर लावण्याची मोहीम मोठ्या धडाक्यात सुरू केली. थातूर-मातूरपणे ठरावीक भागात नळाला मीटर लावल्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा तर सोडाच, आता आठव्या दिवशीसुद्धा पाणी पुरवठा होत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत ज्या नळाला मीटर लावण्याची घिसाडघाई करण्यात आली, त्या पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी शहरातील ७२ हजार मालमत्ताधारकांपैकी ३६ हजार मालमत्ताधारकांकडे नळाचे कनेक्शन असल्याची नोंद होती. यापैकी बोटावर मोजता येणारे पाणीपट्टीधारक मनपाकडे पाणीपट्टी कर जमा करीत होते. अर्थातच, शहरातील लोकसंख्येची आकडेमोड लक्षात घेतल्यास इतर सर्व मालमत्ताधारक मनपाच्या पाण्याचा फुकटात वापर करीत असल्याचे चित्र होते. अधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या निश्चित नसल्याने शहराला दैनंदिन किती लाख लीटर पाणी पुरवठा होतो, याचा काहीही ताळमेळ नव्हता. ही बाब ध्यानात घेता प्रशासनाने नळाला मीटर लावण्याची मोहीम सुरू केली. हद्दवाढ होण्यापूर्वी ठरावीक प्रभागात नळाला मीटर लावण्याची मोहीम राबवून जलप्रदाय विभागाने हात वर केले. सद्यस्थितीत शहरातील मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ५४ हजार असली, तरी त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन व मीटर लावले आहेत. नळाला मीटर लावल्यास दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सदरचे आश्वासन हवेत विरले असून, मीटर रिडिंग न घेताच संबंधित मालमत्ताधारकांना देयक अदा करण्याचा अफलातून प्रकार होत आहे. यावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन सादर केले. यावेळी सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे, योगेश गीते आदी उपस्थित होते. मोहीम का थांबवली?शहराच्या विशिष्ट भागात नळाला मीटर लावल्यानंतर प्रशासनाने ही मोहीम थांबवल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतर भागात ही मोहीम न राबवण्याचे काय कारण, असा सवाल शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. ज्या भागात मीटर लावले नसतील, त्या भागातील नागरिकांना अतिरिक्त दंड न आकारता जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका