शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पाण्याचा पत्ता नाही, तरीही देयक वाटपाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 15:09 IST

पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देहरातील मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ५४ हजार असली, तरी त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन व मीटर लावले आहेत. नळाला मीटर लावल्यास दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मीटर रिडिंग न घेताच संबंधित मालमत्ताधारकांना देयक अदा करण्याचा अफलातून प्रकार होत आहे.

अकोला : शहरवासीयांना दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगत मनपा प्रशासनाने नळाला मीटर लावण्याची मोहीम मोठ्या धडाक्यात सुरू केली. थातूर-मातूरपणे ठरावीक भागात नळाला मीटर लावल्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा तर सोडाच, आता आठव्या दिवशीसुद्धा पाणी पुरवठा होत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत ज्या नळाला मीटर लावण्याची घिसाडघाई करण्यात आली, त्या पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी शहरातील ७२ हजार मालमत्ताधारकांपैकी ३६ हजार मालमत्ताधारकांकडे नळाचे कनेक्शन असल्याची नोंद होती. यापैकी बोटावर मोजता येणारे पाणीपट्टीधारक मनपाकडे पाणीपट्टी कर जमा करीत होते. अर्थातच, शहरातील लोकसंख्येची आकडेमोड लक्षात घेतल्यास इतर सर्व मालमत्ताधारक मनपाच्या पाण्याचा फुकटात वापर करीत असल्याचे चित्र होते. अधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या निश्चित नसल्याने शहराला दैनंदिन किती लाख लीटर पाणी पुरवठा होतो, याचा काहीही ताळमेळ नव्हता. ही बाब ध्यानात घेता प्रशासनाने नळाला मीटर लावण्याची मोहीम सुरू केली. हद्दवाढ होण्यापूर्वी ठरावीक प्रभागात नळाला मीटर लावण्याची मोहीम राबवून जलप्रदाय विभागाने हात वर केले. सद्यस्थितीत शहरातील मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ५४ हजार असली, तरी त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन व मीटर लावले आहेत. नळाला मीटर लावल्यास दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सदरचे आश्वासन हवेत विरले असून, मीटर रिडिंग न घेताच संबंधित मालमत्ताधारकांना देयक अदा करण्याचा अफलातून प्रकार होत आहे. यावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन सादर केले. यावेळी सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे, योगेश गीते आदी उपस्थित होते. मोहीम का थांबवली?शहराच्या विशिष्ट भागात नळाला मीटर लावल्यानंतर प्रशासनाने ही मोहीम थांबवल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतर भागात ही मोहीम न राबवण्याचे काय कारण, असा सवाल शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. ज्या भागात मीटर लावले नसतील, त्या भागातील नागरिकांना अतिरिक्त दंड न आकारता जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका