शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

पश्चिम वऱ्हाडासाठी उपकेंद्र नको; स्वतंत्र विद्यापीठ हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:14 IST

पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का, यासाठी सात सदस्यांचा अभ्यासगट उच्च व तंत्रशिक्षण विभाग स्थापन करणार असल्याचे या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. या पृष्ठभूमीवर पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३मध्ये करण्यात आली. या विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले असून पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या विद्यापीठाचे आहे.या विद्यापीठांतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांचे अंतर लक्षात घेता विद्यापीठाच्या निर्मितीपासून पश्चिम वºहाडासाठी उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी होती. सन १९९५ ला तत्कालीन सिनेट सदस्यांनी सिनेटमध्ये वाशिमसंदर्भात तसा ठरावही पारित करून घेतला होता. सन २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुलडाण्यात उपकेंद्र सुरू करण्याची ग्वाहीही दिली होती; मात्र पश्चिम वऱ्हाडाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्षच होत गेले.आता उपकेंद्राची उपयुक्तताही संपली असून, पश्चिम वºहाडातील शैक्षणिक व्याप्ती लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठाचीच गरज निर्माण झाली आहे.

मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच!अमरावती विद्यापीठावरील शैक्षणिक ताण लक्षात घेता १९९७ पासून उपकेंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र ही मागणी दुर्लक्षितच राहिली. या दरम्यान पुणे, मुंबई, नांदेड, जळगाव या विद्यापीठांचे उपकेंद्र अस्तित्वात आले व आता उस्मानाबादचे केंद्र हे विद्यापीठ होण्याकडे वाटचाल करत आहे. यापासून धडा घेत आता पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाचीच मागणी रेटून धरण्याची गरज आहे.

तर मराठवाड्यात तिसरे विद्यापीठउस्मानाबादचे विद्यापीठ अस्तित्वात आले तर आठ जिल्ह्यांच्या मराठवाड्यातील हे तिसरे विद्यापीठ ठरेल. दुसरीकडे विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी तीन विद्यापीठ कार्यरत असले तरी त्यामधील अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ करण्याची जुनी मागणी आहे. त्यामुळे उस्मानाबादसाठी ज्या प्रमाणे अभ्यासगट स्थापन केला आहे, त्याच धर्तीवर पश्चिम वºहाडासाठीही चाचपणी व्हावी.

पश्चिम वऱ्हाडालाही लागतो अंतराचा निकषऔरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मग हाच निकष पश्चिम वºहाडासाठीही लागू होतो. बुलडाण्यातील सिंदखेडराजा, वाशिममधील केनवड असो की अकोल्यातील पातूर, बाळापूर तालुक्यातील दुर्गम गावे असोत, या गावांमधील विद्यार्थ्यांना अमरावतीत पोहोचणे त्रासदायकच आहे.

अमरावती विद्यापीठाचे विभाजन ही मागणी जुनीच आहे. उस्मानाबादच्या निमित्ताने या मागणीला मूर्तरूप येण्याची गरज आहे. महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता लहान विद्यापीठ हे अधिक दर्जेदार ठरू शकते. त्यामुळे पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे.-डॉ. संजय खडक्कारविद्वत परिषद सदस्य, यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठ

पश्चिम वऱ्हाडासाठी अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करणे आता फारसे उपयुक्त नाही. त्यामुळे स्वतंत्र विद्यापीठच या परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस महत्त्वाचे ठरेल. या बाबत मी स्वत: मागणी केलेलीच आहे. त्याचा आणखी पाठपुरावा या निमित्ताने करता येईल.-डॉ. नीलेश गावंडेव्यवस्थापन समिती सदस्यसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र