शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पश्चिम वऱ्हाडासाठी उपकेंद्र नको; स्वतंत्र विद्यापीठ हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:14 IST

पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का, यासाठी सात सदस्यांचा अभ्यासगट उच्च व तंत्रशिक्षण विभाग स्थापन करणार असल्याचे या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. या पृष्ठभूमीवर पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३मध्ये करण्यात आली. या विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले असून पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या विद्यापीठाचे आहे.या विद्यापीठांतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांचे अंतर लक्षात घेता विद्यापीठाच्या निर्मितीपासून पश्चिम वºहाडासाठी उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी होती. सन १९९५ ला तत्कालीन सिनेट सदस्यांनी सिनेटमध्ये वाशिमसंदर्भात तसा ठरावही पारित करून घेतला होता. सन २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुलडाण्यात उपकेंद्र सुरू करण्याची ग्वाहीही दिली होती; मात्र पश्चिम वऱ्हाडाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्षच होत गेले.आता उपकेंद्राची उपयुक्तताही संपली असून, पश्चिम वºहाडातील शैक्षणिक व्याप्ती लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठाचीच गरज निर्माण झाली आहे.

मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच!अमरावती विद्यापीठावरील शैक्षणिक ताण लक्षात घेता १९९७ पासून उपकेंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र ही मागणी दुर्लक्षितच राहिली. या दरम्यान पुणे, मुंबई, नांदेड, जळगाव या विद्यापीठांचे उपकेंद्र अस्तित्वात आले व आता उस्मानाबादचे केंद्र हे विद्यापीठ होण्याकडे वाटचाल करत आहे. यापासून धडा घेत आता पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाचीच मागणी रेटून धरण्याची गरज आहे.

तर मराठवाड्यात तिसरे विद्यापीठउस्मानाबादचे विद्यापीठ अस्तित्वात आले तर आठ जिल्ह्यांच्या मराठवाड्यातील हे तिसरे विद्यापीठ ठरेल. दुसरीकडे विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी तीन विद्यापीठ कार्यरत असले तरी त्यामधील अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ करण्याची जुनी मागणी आहे. त्यामुळे उस्मानाबादसाठी ज्या प्रमाणे अभ्यासगट स्थापन केला आहे, त्याच धर्तीवर पश्चिम वºहाडासाठीही चाचपणी व्हावी.

पश्चिम वऱ्हाडालाही लागतो अंतराचा निकषऔरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मग हाच निकष पश्चिम वºहाडासाठीही लागू होतो. बुलडाण्यातील सिंदखेडराजा, वाशिममधील केनवड असो की अकोल्यातील पातूर, बाळापूर तालुक्यातील दुर्गम गावे असोत, या गावांमधील विद्यार्थ्यांना अमरावतीत पोहोचणे त्रासदायकच आहे.

अमरावती विद्यापीठाचे विभाजन ही मागणी जुनीच आहे. उस्मानाबादच्या निमित्ताने या मागणीला मूर्तरूप येण्याची गरज आहे. महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता लहान विद्यापीठ हे अधिक दर्जेदार ठरू शकते. त्यामुळे पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे.-डॉ. संजय खडक्कारविद्वत परिषद सदस्य, यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठ

पश्चिम वऱ्हाडासाठी अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करणे आता फारसे उपयुक्त नाही. त्यामुळे स्वतंत्र विद्यापीठच या परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस महत्त्वाचे ठरेल. या बाबत मी स्वत: मागणी केलेलीच आहे. त्याचा आणखी पाठपुरावा या निमित्ताने करता येईल.-डॉ. नीलेश गावंडेव्यवस्थापन समिती सदस्यसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र