शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा, तरीही अडीच लाख विद्यार्थी पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

राज्यात कोरोनाचे संकट अधिकच गतीने वाढत आहे. रूग्ण वाढत आहे. राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ...

राज्यात कोरोनाचे संकट अधिकच गतीने वाढत आहे. रूग्ण वाढत आहे. राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून परीक्षा घेणे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे. त्यामुळे शासनाने इयत्ता पहिली ते नववी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालकांसोबतच शिक्षकांना सुद्धा दिलासा मिळाला. परीक्षा झाली असती तर विद्यार्थ्यांनी दररोज पेपरसाठी शाळेत सोडून देण्याचे काम पालकांना करावे लागले असते. तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या लागणार होत्या. शिक्षकांनाही विषयनिहाय पेपर तपासावे लागणार होते. परंतु आता परीक्षाच रद्द करण्यात पेपर तपासण्याच्या त्रासातून शिक्षकांची मुक्तताच झाली.

पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी

अकोला पं.स.- ९१६७४

अकोट- ३४४५५

बाळापूर- २५५२४

बार्शीटाकळी- १७०११

मूर्तिजापूर- २००६३

पातूर- १७१६५

तेल्हारा- २१८४२

मनपा क्षेत्र- ७४७९

.....................................

एकूण- २३५२१३

जिल्ह्यातील शाळा- १८६८

जि. प. शाळा- ९१२

अनुदानित शाळा- ६७४

विनाअनुदानित शाळा- २८२

ऑनलाइन शिक्षण....

फायदे

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम झालेला नाही.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा न घेणे योग्यच ठरले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागली. परीक्षा घेतल्या असत्या तर विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी शाळेत यावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका होता. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला नाही. ऑनलाईन शिक्षण घेताना, अनेक तांत्रिक अडचणींना सामना करावा लागला.

ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्था, युवक, युवती मुलांच्या शिक्षणासाठी पुढे सरसावले

तोटे....

ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागासह डोंगराळ भागात इंटरनेट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले. शाळा बंद, शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.

नेटची सुविधा, अनेक विद्यार्थ्यांकडे पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे दैनंदिन अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला नाही. एकंदरित ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून आले.

शहरात मात्र, विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप आदी सुविधा असल्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता आला. शहरात नेटचा फारसा त्रास झाला नाही. शाळांकडून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ, पेपर देण्यात येत होते. यात अडचणी आल्या असल्या तरी शहरी भागातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेने फारसे शैक्षणिक नुकसान झाले नाही.