शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

बायोमेट्रिक मशीनच नाहीत; कर्जमाफीचे अर्ज भरणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:09 IST

अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फत ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्ध नसल्याने, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरणार कसे, असा प्रश्न जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांपुढे समस्या थकबाकीदार शेतकर्‍यांकडून भरून घेण्यात येत आहेत ‘ऑनलाइन’ अर्जबायोमेट्रिक मशीन केव्हा उपलब्ध होणार असा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फत ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्ध नसल्याने, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरणार कसे, असा प्रश्न जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांपुढे निर्माण झाला आहे. सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार  शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून जिल्हय़ात सुरू करण्यात आली. महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायतींचे आपले सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्रांमार्फत शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्यात येत आहेत. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) असणे आवश्यक आहे; परंतु अनेक शेतकर्‍यांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी ‘लिंक’ नसल्याने, ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बायोमेट्रिक मशीन आवश्यक आहेत; परंतु जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर शासनामार्फत अद्याप बायोमेट्रिक मशीन उपलब्ध झाल्या नाही. त्यामुळे आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर बायोमेट्रिक मशीन केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांसमोर निर्माण झाला आहे.

जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर शासनाकडून बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होणार आहेत. मशीन उपलब्ध झाल्यानंतर आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्याच्या कामाला गती येणार आहे.-सागर भुतडा, जिल्हा समन्वयक, महाऑनलाईन