शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विभागात अकोला जिल्हा दहावीच्या निकालात नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

नववीचा अंतिम निकाल, दहावीतील वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि अंतिम तोंडी प्रात्यक्षिक या आधारे शाळांनी बोर्डाकडे गुण पाठविले होते. ...

नववीचा अंतिम निकाल, दहावीतील वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि अंतिम तोंडी प्रात्यक्षिक या आधारे शाळांनी बोर्डाकडे गुण पाठविले होते. त्यानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालाविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती. कोरोनामुळे प्रथमच विद्यार्थ्यांना परीक्षेविना दहावी उत्तीर्ण करावी लागली. त्यामुळे दहावीचा निकाल कसा लागेल, किती गुण मिळतील, याविषयी पालकांच्या मनात संभ्रम होता. परंतु, निकाल लागल्यानंतर तो संभ्रम दूर झाला. जिल्ह्याचा निकाल ९९.९९ टक्के लागल्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी समाधान व्यक्त केले.

पाच तालुक्यांचा निकाल शंभर टक्के!

जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांचा समावेश आहे. अकोला तालुक्याचा निकाल ९९.९९ टक्के, तर बार्शीटाकळी तालुक्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. एकंदरीत निकालावरून यंदा ग्रामीण भागातील शाळांचा निकाल दर्जेदार लागल्याचे दिसून येत आहे.

असा लागला निकाल

राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना नऊ जुलैपर्यंत मुदत दिली होती. शाळांनी संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण व मूल्यमापनाचे गुण विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविले. मंडळाने शाळांकडून आलेले गुण एकत्रित करून अंतिम निकाल तयार केला.

संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे शाळांची नाराजी

राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळांवर जिल्ह्यातील दहावी असलेल्या ३४४ शाळांनी ऑनलाईन निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुपारचे तीन वाजल्यानंतरही शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. एकाचवेळी शाळा आणि विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट दिल्यामुळे साईट क्रॅश झाली. मंडळाने एकच साईट दिल्याने, त्यावर ताण आला. त्यामुळे शाळांसह विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. त्यामुळे शाळांनी नाराजी व्यक्त केली.

कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, लेखी परीक्षांचे गुण शाळांमार्फत पाठविण्यात आले. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांचा निकाल काय लागणारे हे आधीच माहिती होती. त्यामुळे निकालाविषयीची जी पूर्वीची उत्सुकता होती ती यंदा राहिली नाही. तो उत्साहसुद्धा यंदा राहिला नाही.

- संगीता जळमकर, मुख्याध्यापिका, बालशिवाजी माध्यमिक शाळा

दहावीची परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण शाळांच्याच हाती होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा निकालाविषयी उत्सुकता नव्हती. कोणता विद्यार्थी टॉपर राहणार, शाळेचा निकाल काय लागणार याची कल्पना होती. यंदा कोरोनामुळे हिरमोड झाला. निकालाविषयी विद्यार्थी, शिक्षकांमध्येही उत्साह नव्हता.

- प्रा. प्रकाश डवले, प्राचार्य डवले पब्लिक स्कूल