शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाणवठ्यातील पाणी प्यायल्याने नऊ शेळ्या, एका हरणाचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST

मुंडगाव: अकोट तालुक्यातील मुंडगाव परिसरातील अमीनपूर शेतशिवारातील एका पाणवठ्याद्वारे गुरांची तहान भागविली जाते. मात्र, मंग‌ळवारी या पाणवठ्यातील पाणी ...

मुंडगाव: अकोट तालुक्यातील मुंडगाव परिसरातील अमीनपूर शेतशिवारातील एका पाणवठ्याद्वारे गुरांची तहान भागविली जाते. मात्र, मंग‌ळवारी या पाणवठ्यातील पाणी प्यायल्याने सात बकऱ्या, दोन पिल्ले व एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. पाणवठ्यातील पाणी प्यायल्यानेच बकऱ्यांचा मृ्त्यू झाल्याचा दावा बकऱ्यांच्या मालकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच, वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडगाव येथील प्रफुल्ल राजू सरकटे, दीपक धांडे, अशोक नवलकार, भाष्कर बेलदार हे शेळ्या चारण्यासाठी अमीनपूर भागात गेले होते. या शिवारातील एका कृत्रिम पाणवठ्यातील पाण्यावर गुरांची तहान भागविली जाते. दरम्यान, या पाणवठ्यातील पाणी प्यायल्यानतंर काही वेळात शेळ्यांचा मृत्यू झाला, तसेच त्यांच्या नाकातून फेस आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे पशुपालकांचे जवळपास एक लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनेबाबत वनविभाग व पोलिसांनी माहिती दिल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बकऱ्यांचे व हरणांचे शवविच्छेदन केले, तसेच पाणवठ्यातील पाण्याचा नमुना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२चे कलम ९,३९,५१ अन्वये वन गुन्हा ५५/१७ दि १६/०३/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपवनसरक्षक के.आर.अर्जुना, सहायक उपवनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन.ओवे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट वनविभागाचे वर्तुळ अधिकारी अजय बावने, एस.जी.जोंधळे, विकास मोरे, दीपक मेसरे हे करीत आहेत. शेळी मालकांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (फोटो)