शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

‘एनएचएम’ कर्मचार्‍यांना मिळणार विम्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:04 IST

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचार्‍यांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मागविली आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांची वैयक्तिक माहिती मागविलीविमा सुविधा लागू करण्यासाठी वैयक्तिक माहिती मागविली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचार्‍यांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मागविली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी अत्यंत तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. हे कर्मचारी गत अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. या कंत्राटी कर्मचारी व अधिकार्‍यांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने गत महिन्यात आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केल्याने या कर्मचार्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या कर्मचार्‍यांना विमा सुविधा लागू करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. विमा योजनेत कर्मचार्‍यांचा समावेश करता यावा, यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती विहित नमुन्यात मागविण्यात आली आहे. जिल्हाभरातील कर्मचार्‍यांची माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. ही योजना त्वरित राबविण्यात येणार असल्यामुळे कर्मचार्‍यांची माहिती १४ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचा आदेश सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र सर्व संबंधित अधिकार्‍यांना ८ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे. विमा योजनेत सर्वच कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात येणार असून, कोणताही कर्मचारी या योजनेपासून वंचित राहू नये, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.