शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी पुढील चार-पाच दिवस चिंतेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST

सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, तीळ, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला ...

सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, तीळ, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळवाऱ्यामुळे या पिकांचे नुकसान होत आहे. बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. पुढील चार-पाच दिवस अवकाळीचे वातावरण कायम राहणार असून हवामान खात्याने गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. उपग्रह छायाचित्रानुसार अकोला, वाशिम, बुलडाणा इत्यादी जिल्ह्यासोबत, मध्य प्रदेशच्या राज्य सीमावर्ती तालुक्यात संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत वादळी, अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

--कोट--

हवेतील वाढलेली आर्द्रता रात्री उशिरापर्यंत अशा वादळी पावसाच्या प्रणालीकरिता मदतगार ठरतं आहे. पुढील आठवडाभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे.

संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक