शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST

अकोला : देशभर २०२० च्या मार्च महिन्यापासून कोरोनाचे नवीन संकट आले आहे. त्यामुळे अनेकांची नोकरी गेली, काहींचे व्यवसाय ...

अकोला : देशभर २०२० च्या मार्च महिन्यापासून कोरोनाचे नवीन संकट आले आहे. त्यामुळे अनेकांची नोकरी गेली, काहींचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे नाइलाजाने छोटी- मोठी गुन्हेगारी करणाऱ्या चोरट्यांचे नवीन चेहरे समोर आले आहेत. यावरून कोरोनाने पोलिसांची डोकेदुखी वाढविल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

दरोडे, चोरी, लुटमार करताना जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत. तशा प्रकारची नोंद पोलीस दप्तरी झालेली आहे. हे काम सराईत गुन्हेगारांकडून नेहमीच करण्यात येते. मात्र, कोरोनाचे संकट आल्यानंतर अनेकांचा रोजगार गेल्याने उदरनिर्वाह किंवा पैशांची चणचण दूर करण्यासाठी काही जण गुन्हेगारीकडे वळल्याचे वास्तव आहे. नवीन गुन्हेगारांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांचे खबरे, तसेच रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर आहे. मात्र, नवीन चोरट्यांनी तसेच गुन्हेगारांनी यामध्ये प्रवेश केल्याने पोलिसांनाही त्यांचा शोध लावणे मोठे आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळेच पोलिसांना आता त्यांचीही संख्या वाढवावी लागणार आहे.

शहरातील गुन्हेगारी

२०१९ -

२०२० -

२०२१ मेपर्यंत -

चोऱ्या, दरोडे -

खून -

जिवे मारण्याचा प्रयत्न -

गुन्हेगारीत नवीन चेहरे का आले?

आर्थिक तुटवडा दूर करण्यासाठी, तसेच काही जण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोट्या- मोठ्या चोऱ्या करत असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दुचाकी चोरट्यांनी केवळ घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. यावरून कोरोनाच्या संकटाने अनेकांना गुन्हेगारीकडे वळविल्याचेही वास्तव आहे. या कारणामुळे गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याची माहिती आहे.

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर पोलीस नजर ठेवून असतात, तसेच पोलिसांचे खबरी या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. ती माहिती पोलिसांना देतात. मात्र, नवीन गुन्हेगारांचा यामध्ये शिरकाव झाल्याने आता पोलिसांनाही खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली, तर आता खबऱ्यांनाही त्यांचे काम पूर्वीपेक्षा बदलावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.

केवळ आर्थिक चणचण भासली म्हणून गुन्हेगारी करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. मात्र, काहींचा पूर्वीचा काळ गुन्हेगाराच्या संगतीतील असेल किंवा तशा प्रकारची त्यांची वागणूक असेल, अशाच व्यक्ती गुन्हेगारीकडे वळल्याचे वास्तव आहे.

-विलास पाटील,

प्रमुख विशेष पथक

गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे याला काही घटनाही जबाबदार असतात. केवळ आर्थिक तुटवडा किंवा पैशाच्या कारणावरून घरात वाद होत असतील, तर काही जण संतापाने रागात गुन्हेगारीकडे वळल्याचे ऐकिवात आहे. मात्र, ही संख्या फार कमी आहे.

-सुजय पाटील,

मानसोपचारतज्ज्ञ अकोला