शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

डिजिटल शाळांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष; मोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:05 IST

अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने  जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने  झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही  अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देअध्यापनात तंत्रज्ञानाचा वापरही झाला दुर्मीळ

बबन इंगळेलोकमत न्यूज नेटवर्कसायखेड  : अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने  जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने  झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही  अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि सीईओ एम. देवेंद्रसिंग यांच्या  कार्यकाळात जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली. लोकसहभागा तून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत सुरुवातीलाच ५५ शाळा डिजिटल करण्यात आल्या.  त्यानंतर दुसर्‍या सत्रात ही मोहीम थंडावली आहे. तालुक्यात एकूण १३६ शाळा  आहेत. त्यापैकी ८१ शाळा अजूनही डिजिटल झाल्या नसल्याचे चित्र आहे. मे  २0१७ पासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली व त्यानंतर विविध  वेबसाइटवर शिक्षकांना माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळा  डिजिटल करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. ज्या शाळा डिजिटल झाल्या, त्या पैकी अनेक शाळांमधील साहित्य धूळ खात पडलेले आहे. ग्रामीण भागातील अनेक  शाळांमध्ये वीज नाही, असली तरी भारनियमनामुळे डिजिटलचे साहित्य उपयोगा तच आणता येत नसल्याचे चित्र आहे. खासगी शाळांमधील अतिरिक्त  शिक्षकांचे  समायोजन आणि जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षकांच्या बदल्या यामुळे  डिजिटल शाळा मोहीम बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे. इंग्रजी माध्यमाचे महागडे शिक्षण शुल्क भरून प्रवेश मिळणार्‍या शाळेप्रमाणे जि.  प.च्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्याची चळवळ उभी  केली; परंतु सध्या ही चळवळ बंद पडल्याने ग्रामीण भागातील बहुतांश जि. प.च्या  शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालल्याचे दिसून येत आहे. ही चळवळ नव्या  उमेदीने गतिमान करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, याकरिता  जनजागृती, लोकसहभागाकरिता प्रवृत्त करणे, याचे महत्त्व प्रसाराद्वारे व्हावे, तरच  या उपक्रमास गती येईल.

अध्यापन विस्कळीत शासनाचे विविध आदेश येत असल्याने तालुक्यातील अनेक शाळांमधील अध्यापन  विस्कळीत झाले आहे. शिक्षकांचा बहुतांश वेळ शासनाने सुरू केलेल्या विविध  वेबसाइटवर भरण्यातच जात असल्याने त्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत  नसल्याचे चित्र आहे. त्यातही समायोजन आणि बदली प्रक्रियेमुळे अनेक शाळांमध्ये  अध्यापन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. 

जि.प.च्या प्राथमिक शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभाग व  प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. शाळा स्तरावरील गावातील  लोकसहभागाअभावी या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याची कारणे समोर आली  आहेत. तरीही ग्रामपातळीवर याबाबत शिक्षण विभागाच्या माध्यमातून जनगृतीची  मोहीम राबविण्याचा प्रयत्न करू. - मीनल भेंडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स. बाश्रीटाकळी.