शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

डिजिटल शाळांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष; मोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:05 IST

अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने  जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने  झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही  अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देअध्यापनात तंत्रज्ञानाचा वापरही झाला दुर्मीळ

बबन इंगळेलोकमत न्यूज नेटवर्कसायखेड  : अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने  जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने  झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही  अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि सीईओ एम. देवेंद्रसिंग यांच्या  कार्यकाळात जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली. लोकसहभागा तून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत सुरुवातीलाच ५५ शाळा डिजिटल करण्यात आल्या.  त्यानंतर दुसर्‍या सत्रात ही मोहीम थंडावली आहे. तालुक्यात एकूण १३६ शाळा  आहेत. त्यापैकी ८१ शाळा अजूनही डिजिटल झाल्या नसल्याचे चित्र आहे. मे  २0१७ पासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली व त्यानंतर विविध  वेबसाइटवर शिक्षकांना माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळा  डिजिटल करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. ज्या शाळा डिजिटल झाल्या, त्या पैकी अनेक शाळांमधील साहित्य धूळ खात पडलेले आहे. ग्रामीण भागातील अनेक  शाळांमध्ये वीज नाही, असली तरी भारनियमनामुळे डिजिटलचे साहित्य उपयोगा तच आणता येत नसल्याचे चित्र आहे. खासगी शाळांमधील अतिरिक्त  शिक्षकांचे  समायोजन आणि जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षकांच्या बदल्या यामुळे  डिजिटल शाळा मोहीम बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे. इंग्रजी माध्यमाचे महागडे शिक्षण शुल्क भरून प्रवेश मिळणार्‍या शाळेप्रमाणे जि.  प.च्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्याची चळवळ उभी  केली; परंतु सध्या ही चळवळ बंद पडल्याने ग्रामीण भागातील बहुतांश जि. प.च्या  शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालल्याचे दिसून येत आहे. ही चळवळ नव्या  उमेदीने गतिमान करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, याकरिता  जनजागृती, लोकसहभागाकरिता प्रवृत्त करणे, याचे महत्त्व प्रसाराद्वारे व्हावे, तरच  या उपक्रमास गती येईल.

अध्यापन विस्कळीत शासनाचे विविध आदेश येत असल्याने तालुक्यातील अनेक शाळांमधील अध्यापन  विस्कळीत झाले आहे. शिक्षकांचा बहुतांश वेळ शासनाने सुरू केलेल्या विविध  वेबसाइटवर भरण्यातच जात असल्याने त्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत  नसल्याचे चित्र आहे. त्यातही समायोजन आणि बदली प्रक्रियेमुळे अनेक शाळांमध्ये  अध्यापन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. 

जि.प.च्या प्राथमिक शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभाग व  प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. शाळा स्तरावरील गावातील  लोकसहभागाअभावी या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याची कारणे समोर आली  आहेत. तरीही ग्रामपातळीवर याबाबत शिक्षण विभागाच्या माध्यमातून जनगृतीची  मोहीम राबविण्याचा प्रयत्न करू. - मीनल भेंडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स. बाश्रीटाकळी.