शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

उपासमार टाळण्यासाठी नवीन धोरणाची गरज

By admin | Updated: December 5, 2014 00:00 IST

जागतिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस यांचे प्रतिपादन; आंतराष्ट्रीय महिला परिसंवादाचे अकोल्यात उद्घाटन.

अकोला : जगात शेतीचे क्षेत्र कमी, पण उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे अनेक देशात नागरिकांना खायला अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याचे वास्तव आहे. यामागील कारणे शोधून, प्रत्येकाला अन्न कसे मिळेल, यासाठीचे नवे धोरण सरकारी यंत्रणांनी आखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल तथा जागतिक शेतकरी संस्थेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस (ऑस्ट्रेलिया) यांनी गुरुवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ४ ते ७ डिसेंबरदरम्यान आंतराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे उद्घाटन आंतराष्ट्रीय महिला शेतकरी प्रतिनिधी जुलियाना स्वै (टांझानिया) आणि ग्रामपरी संस्थेच्या कार्यकारी संचालक जयश्री राव यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, नागपूरस्थित नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनचे सचिव जीम व्हिगन (ग्रेट ब्रिटन), इनिशिएटिव्ह ऑफ चेंज या संस्थेचे रवींद्र राव (पाचगणी), रतन टाटा ट्रस्टचे अभितांशु चौधरी, डॉ. पी. जी. इंगोले, आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अन्नधान्याचे उत्पादन वाढत असताना, शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला पूरक भाव मिळण्याची गरज फिल जेफ्रिस यांनी अधोरेखित केली. त्यादृष्टीने बाजारपेठेची व्यवस्था असली पाहिजे. आपण भरघोस उत्पादनाच्या दिशेने धावत असलो तरी मानवी आरोग्यावर घातक परिणाम करणारी कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर शेतीत कमी करण्याची नितांत गरज आहे; किंबहुना शाश्‍वत शेतीच यापुढे तारणार असल्याचे ते म्हणाले. या परिसंवादाच्या माध्यमातून जागतिक शेती अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सततची नापिकी, बाजारभावातील तफावत, तसेच वारंवार उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना जगाचा पोशिंदा जेरीस आला आहे. असे परिसंवाद शेतकर्‍यांना दिशादर्शक ठरावेत, त्यातून नवे मार्ग निघावेत, असा आशावाद खासदार धोत्रे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. दाणी यांनी शेतीमधील महिलांचा निर्णायक सहभाग वाढविल्याशिवाय व पूरक व्यवसायाची कास धरल्याशिवाय शेती शाश्‍वत आणि शेतकरी समृद्ध होणार नाही, असे सांगून परिसंवादाच्या माध्यमातून ठोस शिफारशी निघाव्यात, जेणेकरू न विदर्भातील शेतकर्‍यांना लाभ घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय परिसंवादाला विदर्भासह राज्यातील महिला-पुरुष शेतकरी, तज्ज्ञांसह ११ देशांतील शेतकरी उपस्थित आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मोहिनी डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे यांनी केले. उद्घाटन सोहळय़ानंतर चर्चासत्राला प्रारंभ करण्यात आला. १0 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या परिसंवादात शेतीशी निगडित विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे.