शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

उपासमार टाळण्यासाठी नवीन धोरणाची गरज

By admin | Updated: December 5, 2014 00:00 IST

जागतिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस यांचे प्रतिपादन; आंतराष्ट्रीय महिला परिसंवादाचे अकोल्यात उद्घाटन.

अकोला : जगात शेतीचे क्षेत्र कमी, पण उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे अनेक देशात नागरिकांना खायला अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याचे वास्तव आहे. यामागील कारणे शोधून, प्रत्येकाला अन्न कसे मिळेल, यासाठीचे नवे धोरण सरकारी यंत्रणांनी आखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल तथा जागतिक शेतकरी संस्थेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस (ऑस्ट्रेलिया) यांनी गुरुवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ४ ते ७ डिसेंबरदरम्यान आंतराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे उद्घाटन आंतराष्ट्रीय महिला शेतकरी प्रतिनिधी जुलियाना स्वै (टांझानिया) आणि ग्रामपरी संस्थेच्या कार्यकारी संचालक जयश्री राव यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, नागपूरस्थित नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनचे सचिव जीम व्हिगन (ग्रेट ब्रिटन), इनिशिएटिव्ह ऑफ चेंज या संस्थेचे रवींद्र राव (पाचगणी), रतन टाटा ट्रस्टचे अभितांशु चौधरी, डॉ. पी. जी. इंगोले, आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अन्नधान्याचे उत्पादन वाढत असताना, शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला पूरक भाव मिळण्याची गरज फिल जेफ्रिस यांनी अधोरेखित केली. त्यादृष्टीने बाजारपेठेची व्यवस्था असली पाहिजे. आपण भरघोस उत्पादनाच्या दिशेने धावत असलो तरी मानवी आरोग्यावर घातक परिणाम करणारी कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर शेतीत कमी करण्याची नितांत गरज आहे; किंबहुना शाश्‍वत शेतीच यापुढे तारणार असल्याचे ते म्हणाले. या परिसंवादाच्या माध्यमातून जागतिक शेती अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सततची नापिकी, बाजारभावातील तफावत, तसेच वारंवार उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना जगाचा पोशिंदा जेरीस आला आहे. असे परिसंवाद शेतकर्‍यांना दिशादर्शक ठरावेत, त्यातून नवे मार्ग निघावेत, असा आशावाद खासदार धोत्रे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. दाणी यांनी शेतीमधील महिलांचा निर्णायक सहभाग वाढविल्याशिवाय व पूरक व्यवसायाची कास धरल्याशिवाय शेती शाश्‍वत आणि शेतकरी समृद्ध होणार नाही, असे सांगून परिसंवादाच्या माध्यमातून ठोस शिफारशी निघाव्यात, जेणेकरू न विदर्भातील शेतकर्‍यांना लाभ घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय परिसंवादाला विदर्भासह राज्यातील महिला-पुरुष शेतकरी, तज्ज्ञांसह ११ देशांतील शेतकरी उपस्थित आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मोहिनी डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे यांनी केले. उद्घाटन सोहळय़ानंतर चर्चासत्राला प्रारंभ करण्यात आला. १0 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या परिसंवादात शेतीशी निगडित विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे.