शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

उपासमार टाळण्यासाठी नवीन धोरणाची गरज

By admin | Updated: December 5, 2014 00:00 IST

जागतिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस यांचे प्रतिपादन; आंतराष्ट्रीय महिला परिसंवादाचे अकोल्यात उद्घाटन.

अकोला : जगात शेतीचे क्षेत्र कमी, पण उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे अनेक देशात नागरिकांना खायला अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याचे वास्तव आहे. यामागील कारणे शोधून, प्रत्येकाला अन्न कसे मिळेल, यासाठीचे नवे धोरण सरकारी यंत्रणांनी आखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल तथा जागतिक शेतकरी संस्थेचे अध्यक्ष फिल जेफ्रिस (ऑस्ट्रेलिया) यांनी गुरुवारी येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ४ ते ७ डिसेंबरदरम्यान आंतराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे उद्घाटन आंतराष्ट्रीय महिला शेतकरी प्रतिनिधी जुलियाना स्वै (टांझानिया) आणि ग्रामपरी संस्थेच्या कार्यकारी संचालक जयश्री राव यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, नागपूरस्थित नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनचे सचिव जीम व्हिगन (ग्रेट ब्रिटन), इनिशिएटिव्ह ऑफ चेंज या संस्थेचे रवींद्र राव (पाचगणी), रतन टाटा ट्रस्टचे अभितांशु चौधरी, डॉ. पी. जी. इंगोले, आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अन्नधान्याचे उत्पादन वाढत असताना, शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला पूरक भाव मिळण्याची गरज फिल जेफ्रिस यांनी अधोरेखित केली. त्यादृष्टीने बाजारपेठेची व्यवस्था असली पाहिजे. आपण भरघोस उत्पादनाच्या दिशेने धावत असलो तरी मानवी आरोग्यावर घातक परिणाम करणारी कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर शेतीत कमी करण्याची नितांत गरज आहे; किंबहुना शाश्‍वत शेतीच यापुढे तारणार असल्याचे ते म्हणाले. या परिसंवादाच्या माध्यमातून जागतिक शेती अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सततची नापिकी, बाजारभावातील तफावत, तसेच वारंवार उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना जगाचा पोशिंदा जेरीस आला आहे. असे परिसंवाद शेतकर्‍यांना दिशादर्शक ठरावेत, त्यातून नवे मार्ग निघावेत, असा आशावाद खासदार धोत्रे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. दाणी यांनी शेतीमधील महिलांचा निर्णायक सहभाग वाढविल्याशिवाय व पूरक व्यवसायाची कास धरल्याशिवाय शेती शाश्‍वत आणि शेतकरी समृद्ध होणार नाही, असे सांगून परिसंवादाच्या माध्यमातून ठोस शिफारशी निघाव्यात, जेणेकरू न विदर्भातील शेतकर्‍यांना लाभ घेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय परिसंवादाला विदर्भासह राज्यातील महिला-पुरुष शेतकरी, तज्ज्ञांसह ११ देशांतील शेतकरी उपस्थित आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मोहिनी डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे यांनी केले. उद्घाटन सोहळय़ानंतर चर्चासत्राला प्रारंभ करण्यात आला. १0 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या परिसंवादात शेतीशी निगडित विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे.