शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अपारंपरिक पिकांचा अवलंब काळाची गरज - प्रदीप इंगोले

By admin | Updated: February 23, 2015 01:54 IST

कृषी विद्यापीठात तीळ, भुईमूग लागवडीवर पीक परिसंवाद.

अकोला: बदलत्या ऋतूचक्राच्या प्रभावाने शेती व्यवसायात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, शेतकरी संभ्रमात असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून सध्यातरी शेतकर्‍यांनी अपारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ज्या शेतकर्‍यांकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकर्‍यांनी उन्हाळी तीळ आणि भुईमुगासारखे मध्यम कालावधीचे पीक घेणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शनिवारी केले.डॉ.पंदेकृवि आणि इफकोच्यावतीने शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनातील कृषी जागर सभागृहात उन्हाळी तीळ व भुईमूग पीक परिसंवाद पार पडला. या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाशिम जिल्हय़ातील प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके, इफकोचे विपणन व्यवस्थापक कोटेचा, कृषी विद्यापीठाचे डॉ. नितीन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसंवादात अपारंपरिक पिके घेण्यावर उपस्थिती तज्ज्ञांनी भर दिला. भुईमूग व तीळ ही पिके मध्यम कालावधीचे आणि अधिक पैसा मिळवून देणारे असल्याने हे पीक शेतकर्‍यांना फायदेशीर असल्याचा सूर यांच्या मार्गदर्शनातून उमटला. तेलबिया संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ मनीष लाडोळे, माने, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पी.पी. चव्हाण यांनी या पिकाचे महत्त्व या परिसंवादातून शेतकर्‍यांना पटवून दिले. फुके व यादवराव ढवळे या प्रगतिशील शेतकर्‍यांनी अनुभव कथन व चित्रफितीद्वारे अपारंपरिक पीक पद्धतीचे फायदे विशद केले.