शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक पिकांचा अवलंब काळाची गरज - प्रदीप इंगोले

By admin | Updated: February 23, 2015 01:54 IST

कृषी विद्यापीठात तीळ, भुईमूग लागवडीवर पीक परिसंवाद.

अकोला: बदलत्या ऋतूचक्राच्या प्रभावाने शेती व्यवसायात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, शेतकरी संभ्रमात असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून सध्यातरी शेतकर्‍यांनी अपारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ज्या शेतकर्‍यांकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकर्‍यांनी उन्हाळी तीळ आणि भुईमुगासारखे मध्यम कालावधीचे पीक घेणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शनिवारी केले.डॉ.पंदेकृवि आणि इफकोच्यावतीने शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनातील कृषी जागर सभागृहात उन्हाळी तीळ व भुईमूग पीक परिसंवाद पार पडला. या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाशिम जिल्हय़ातील प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके, इफकोचे विपणन व्यवस्थापक कोटेचा, कृषी विद्यापीठाचे डॉ. नितीन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसंवादात अपारंपरिक पिके घेण्यावर उपस्थिती तज्ज्ञांनी भर दिला. भुईमूग व तीळ ही पिके मध्यम कालावधीचे आणि अधिक पैसा मिळवून देणारे असल्याने हे पीक शेतकर्‍यांना फायदेशीर असल्याचा सूर यांच्या मार्गदर्शनातून उमटला. तेलबिया संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ मनीष लाडोळे, माने, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पी.पी. चव्हाण यांनी या पिकाचे महत्त्व या परिसंवादातून शेतकर्‍यांना पटवून दिले. फुके व यादवराव ढवळे या प्रगतिशील शेतकर्‍यांनी अनुभव कथन व चित्रफितीद्वारे अपारंपरिक पीक पद्धतीचे फायदे विशद केले.