शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भेदभाव मिटवण्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक

By admin | Updated: January 25, 2016 02:12 IST

तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळय़ात अरुण सावंत यांचे अवाहन.

अकोला: तुकाराम महाराजांच्या विचारांचा समाज घडविण्यासाठी आज सामाजिक भेदभाव मिटविणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे वक्तव्य राजस्थान व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा संत तुकाराम सामाजिक विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी केले. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्य़ानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमत ह्यशेतकर्‍यांचे समुपदेशन : कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेती कशी करावी?ह्ण या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धव गाडेकर महाराज, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, सुरेश पाटीलखेडे, प्रा. डॉ. सुभाष भडांगे, विजय कौसल, प्रकाश बोर्डे, दीपक भरणे, सुभाष दातकर, सुरेखाताई मेतकर, सुमनताई भालदाणे, शोभाताई शेळके, रामेश्‍वर बरगट, प्रकाश तायडे, पंकज जायले, कृष्णराव देशमुख, वासुदेव बेंडे, राजेश डोंगरकर, नंदू बोपुलकर, श्रीकांत ढगेकर, डॉ. सुधीर ढोणे, प्रा. दिलीप सावरकर, प्रमोद देंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनिष्ट रुढी, परंपरेला तिलांजली देऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आज समाजातील भेद दूर करणे आवश्यक आहे; परंतु त्यांच्या विचारांनी समाज परिवर्तनाचे हे समीकरण अद्यापही जुळले नसल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. या सामाजिक विषमतेमुळेच आज शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. याच सामाजिक विषमतेचे उदाहरण देताना ते म्हणाले की, राज्यातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्यावरही त्यांना कोट्यवधीचे कर्ज दिल्या जाते. यामध्ये नुकसान होऊनही उद्योजक आत्महत्या करत नाही. तर दुसरीकडे भूमिहीन शेतकर्‍यांना कर्जदेखील मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीपलीकडे जाऊन व्यवसायाचा विचार करणे गरजेचे असून, समाजबांधवांनी त्यांना मार्गदर्शन करून समाजातील विषमता दूर करण्याचे आवाहन डॉ. अरुण सावंत यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक शेळके यांनी, सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी, तर आभार अँड. संतोष भोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल तायडे, शिवदास महल्ले, राजेश्‍वर वाकोडे, अभिजित गहुकर, सागर दळवी, स्वप्निल अहीर, मंगेश लांडगे, राजू सावरकर, अनंत फाटे, पांडुरंग सोनटक्के, नरेंद्र चितोडे, किशोर कुचडे, आशीष शेळके आदींनी परिश्रम घेतले.