शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सामाजिक भेदभाव मिटवण्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक

By admin | Updated: January 25, 2016 02:12 IST

तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळय़ात अरुण सावंत यांचे अवाहन.

अकोला: तुकाराम महाराजांच्या विचारांचा समाज घडविण्यासाठी आज सामाजिक भेदभाव मिटविणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे वक्तव्य राजस्थान व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा संत तुकाराम सामाजिक विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी केले. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्य़ानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमत ह्यशेतकर्‍यांचे समुपदेशन : कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेती कशी करावी?ह्ण या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धव गाडेकर महाराज, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, सुरेश पाटीलखेडे, प्रा. डॉ. सुभाष भडांगे, विजय कौसल, प्रकाश बोर्डे, दीपक भरणे, सुभाष दातकर, सुरेखाताई मेतकर, सुमनताई भालदाणे, शोभाताई शेळके, रामेश्‍वर बरगट, प्रकाश तायडे, पंकज जायले, कृष्णराव देशमुख, वासुदेव बेंडे, राजेश डोंगरकर, नंदू बोपुलकर, श्रीकांत ढगेकर, डॉ. सुधीर ढोणे, प्रा. दिलीप सावरकर, प्रमोद देंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनिष्ट रुढी, परंपरेला तिलांजली देऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आज समाजातील भेद दूर करणे आवश्यक आहे; परंतु त्यांच्या विचारांनी समाज परिवर्तनाचे हे समीकरण अद्यापही जुळले नसल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. या सामाजिक विषमतेमुळेच आज शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. याच सामाजिक विषमतेचे उदाहरण देताना ते म्हणाले की, राज्यातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्यावरही त्यांना कोट्यवधीचे कर्ज दिल्या जाते. यामध्ये नुकसान होऊनही उद्योजक आत्महत्या करत नाही. तर दुसरीकडे भूमिहीन शेतकर्‍यांना कर्जदेखील मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीपलीकडे जाऊन व्यवसायाचा विचार करणे गरजेचे असून, समाजबांधवांनी त्यांना मार्गदर्शन करून समाजातील विषमता दूर करण्याचे आवाहन डॉ. अरुण सावंत यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक शेळके यांनी, सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी, तर आभार अँड. संतोष भोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल तायडे, शिवदास महल्ले, राजेश्‍वर वाकोडे, अभिजित गहुकर, सागर दळवी, स्वप्निल अहीर, मंगेश लांडगे, राजू सावरकर, अनंत फाटे, पांडुरंग सोनटक्के, नरेंद्र चितोडे, किशोर कुचडे, आशीष शेळके आदींनी परिश्रम घेतले.