शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भेदभाव मिटवण्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक

By admin | Updated: January 25, 2016 02:12 IST

तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळय़ात अरुण सावंत यांचे अवाहन.

अकोला: तुकाराम महाराजांच्या विचारांचा समाज घडविण्यासाठी आज सामाजिक भेदभाव मिटविणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे वक्तव्य राजस्थान व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा संत तुकाराम सामाजिक विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी केले. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्य़ानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमत ह्यशेतकर्‍यांचे समुपदेशन : कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेती कशी करावी?ह्ण या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धव गाडेकर महाराज, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, सुरेश पाटीलखेडे, प्रा. डॉ. सुभाष भडांगे, विजय कौसल, प्रकाश बोर्डे, दीपक भरणे, सुभाष दातकर, सुरेखाताई मेतकर, सुमनताई भालदाणे, शोभाताई शेळके, रामेश्‍वर बरगट, प्रकाश तायडे, पंकज जायले, कृष्णराव देशमुख, वासुदेव बेंडे, राजेश डोंगरकर, नंदू बोपुलकर, श्रीकांत ढगेकर, डॉ. सुधीर ढोणे, प्रा. दिलीप सावरकर, प्रमोद देंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनिष्ट रुढी, परंपरेला तिलांजली देऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आज समाजातील भेद दूर करणे आवश्यक आहे; परंतु त्यांच्या विचारांनी समाज परिवर्तनाचे हे समीकरण अद्यापही जुळले नसल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. या सामाजिक विषमतेमुळेच आज शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. याच सामाजिक विषमतेचे उदाहरण देताना ते म्हणाले की, राज्यातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्यावरही त्यांना कोट्यवधीचे कर्ज दिल्या जाते. यामध्ये नुकसान होऊनही उद्योजक आत्महत्या करत नाही. तर दुसरीकडे भूमिहीन शेतकर्‍यांना कर्जदेखील मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीपलीकडे जाऊन व्यवसायाचा विचार करणे गरजेचे असून, समाजबांधवांनी त्यांना मार्गदर्शन करून समाजातील विषमता दूर करण्याचे आवाहन डॉ. अरुण सावंत यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक शेळके यांनी, सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी, तर आभार अँड. संतोष भोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल तायडे, शिवदास महल्ले, राजेश्‍वर वाकोडे, अभिजित गहुकर, सागर दळवी, स्वप्निल अहीर, मंगेश लांडगे, राजू सावरकर, अनंत फाटे, पांडुरंग सोनटक्के, नरेंद्र चितोडे, किशोर कुचडे, आशीष शेळके आदींनी परिश्रम घेतले.