शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

रब्बी पिकांच्या व्यवस्थापनाची गरज!

By admin | Updated: November 17, 2014 01:29 IST

एकात्मिक किड व्यवस्थापनाची गरज; कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक.

अकोला: रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीपासूनच काळजी घेण्याची गरज असून, किडीचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास उत्पादनात भर पडत असल्याने शेतकर्‍यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ओलिताखालील गव्हाची पेरणीसाठी एच.डी.-२१८९, एकेडब्ल्यू १0७१, एच.डी.२३८0, एमएसीएस-२४९६ या वाणांच्या लागवडीची शिफारस केलेली आहे. गहू पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. हरभरा पिकांची पेरणी मागील आठवड्यापर्यंत तर काही शेतकर्‍यांनी रविवार, १६ नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली आहे. या पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्‍यांनी बीज प्रक्रिया ही महत्त्वाची उपाययोजना पेरणीसमयी करण्याची गरज आहे. हरभरा या पिकावर सुरुवातीपासूनच घाटेअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकर्‍यांनी या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. ही कीड हरभर्‍याचे प्रचंड नुकसान करीत असते. त्यासाठी सुरुवातीला एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज असून, या किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकर्‍यांनी कोबी, फुलकोबीच्या रोपाची पुनर्लागवड करावी, तसेच मुळा, गाजराच्या बियाण्यांची पेरणी करावी, इतर पालेभाज्यांची टप्याटप्याने पेरणी करणे गरजेचे आहे. या शिवाय रब्बी कांदा पेरणीसाठी रोपवाटिका तयार केली असेलच, नसेल तर रोपवाटिका तयार करावी, या काळात गुलाबाची हलकी छाटणी करणे आवश्यक आहे. निशिगंधा व गिलार्डिया या फुलांच्या काढणीचा वेळ असल्याने या फुलांची काढणी करावी.