शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शंकराचार्यांच्या परिशीलनाला अधिष्ठानाची गरज - स्वानंद पुंड

By admin | Updated: May 3, 2017 01:12 IST

अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असल्याचे मत प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.

अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असून, यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या सृजनशील व राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याची ओळख होऊ शकत असल्याचे मत वणी येथील विद्यावाचस्पती प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.आद्य शंकराचार्य प्रतिष्ठान अकोल्याच्या वतीने आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीवर रविवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात पुंड हे शंकराचार्यांच्या जीवन कार्यावर बोलत होते. राणी सती धामचे अध्यक्ष जगदीशप्रसाद बाछुका यांच्या अध्यक्षतेत संपन्न या व्याख्यान कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवी तात्यासाहेब वायचाळ, काकासाहेब जोशी उपस्थित होते.प्रा.डॉ. पुंड पुढे म्हणाले, शंकराचार्यांच्या संदर्भात आज काहीही वक्तव्य केले जाते. आद्य शंकराचार्य हे अगदी आठ वर्षाच्या वयात चार वेदाचे भाष्यकार झालेत. त्यांनी आपल्या अल्पजीवनात धर्माच्या अधिष्ठानासाठी भारताच्या चार दिशेत चार शक्तिपीठे स्थापन केलीत. अगदी उत्तरेच्या पीठावर दक्षिणेच्या व्यक्तीला बसवून राष्ट्रीय एकात्मतेचा जगाला परिचय करून दिला. त्यांच्या या शैव व वैष्णव पंथीय विचारांना जोडण्याच्या प्रक्रियेमुळेच भारतात खऱ््या अर्थाने धर्म जागृत होऊन नांदू लागला असल्याचे त्यांनी सांगून धर्माची व्याख्या प्रतिपादित केली. त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी अद्वितीय कार्य केले. चार स्थापित शक्तिपीठावर चार महाकुंभाची निर्मिती केली. आज या स्थानावर कुंभमेळ्यात कोट्यवधी व्यक्ती जमा होऊन धर्मचिंतन करीत असल्याचे व्याख्यानात सांगितले. यावेळी पुंड व बाछुका यांचा सत्कार करण्यात आला. अथितीचें स्वागत काका जोशी, नंदू त्रिवाड, अमोल पाटील, गिरीश बावणे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. महेश मोडक यांनी तर आभार काकासाहेब जोशी यांनी मानले.