शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: December 29, 2014 01:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बच्चू कडू यांचे प्रतिपादन.

अकोला : निसर्गाच्या कोपामुळे आणि मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशीच राहण्याची पाळी आली आहे. घर, दार, शेती विकूनदेखील कष्टात जीवन जगणारे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. समाज आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून या अन्नदात्याला वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात रविवारी दुपारी पार पडलेल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, समाजजागृतीकरिता कीर्तन, भजन, मेळावे, महोत्सव तर व्हायलाच हवेत, मात्र स्वत:चा देह झिजवून तुम्हा-आम्हा सर्वांचे पोट भरण्यासाठी हाडाची काडं करणार्‍या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परिस्थितीने हतबल झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहेत. त्यांचे मतपरिवर्तन करण्याची खरी गरज असल्याने, ग्रामगीतेच्या माध्यमातून ती प्रत्येक गावात पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गुरुदेवभक्तांना केले. केवळ शासकीय योजना व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामूहिक प्रयत्नांची जोड देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. युवा महोत्सवात कपिल ढोक यांनी राष्ट्रसंतांना अपेक्षित भारताची संकल्पना विषद केली आणि बुवाबाजी करून संत म्हणवू घेणार्‍यांवर परखड ताशेरे ओढले. बुलडाण्याचे दीपक महाराज साबळे यांनी राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी पोहचविण्यासठी असे कार्यक्रम गावागावांत घेतल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.