शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: December 29, 2014 01:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बच्चू कडू यांचे प्रतिपादन.

अकोला : निसर्गाच्या कोपामुळे आणि मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशीच राहण्याची पाळी आली आहे. घर, दार, शेती विकूनदेखील कष्टात जीवन जगणारे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. समाज आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून या अन्नदात्याला वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात रविवारी दुपारी पार पडलेल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, समाजजागृतीकरिता कीर्तन, भजन, मेळावे, महोत्सव तर व्हायलाच हवेत, मात्र स्वत:चा देह झिजवून तुम्हा-आम्हा सर्वांचे पोट भरण्यासाठी हाडाची काडं करणार्‍या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परिस्थितीने हतबल झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहेत. त्यांचे मतपरिवर्तन करण्याची खरी गरज असल्याने, ग्रामगीतेच्या माध्यमातून ती प्रत्येक गावात पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गुरुदेवभक्तांना केले. केवळ शासकीय योजना व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामूहिक प्रयत्नांची जोड देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. युवा महोत्सवात कपिल ढोक यांनी राष्ट्रसंतांना अपेक्षित भारताची संकल्पना विषद केली आणि बुवाबाजी करून संत म्हणवू घेणार्‍यांवर परखड ताशेरे ओढले. बुलडाण्याचे दीपक महाराज साबळे यांनी राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी पोहचविण्यासठी असे कार्यक्रम गावागावांत घेतल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.