शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: December 29, 2014 01:46 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात बच्चू कडू यांचे प्रतिपादन.

अकोला : निसर्गाच्या कोपामुळे आणि मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशीच राहण्याची पाळी आली आहे. घर, दार, शेती विकूनदेखील कष्टात जीवन जगणारे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. समाज आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून या अन्नदात्याला वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात रविवारी दुपारी पार पडलेल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, समाजजागृतीकरिता कीर्तन, भजन, मेळावे, महोत्सव तर व्हायलाच हवेत, मात्र स्वत:चा देह झिजवून तुम्हा-आम्हा सर्वांचे पोट भरण्यासाठी हाडाची काडं करणार्‍या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. परिस्थितीने हतबल झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहेत. त्यांचे मतपरिवर्तन करण्याची खरी गरज असल्याने, ग्रामगीतेच्या माध्यमातून ती प्रत्येक गावात पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी गुरुदेवभक्तांना केले. केवळ शासकीय योजना व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामूहिक प्रयत्नांची जोड देण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. युवा महोत्सवात कपिल ढोक यांनी राष्ट्रसंतांना अपेक्षित भारताची संकल्पना विषद केली आणि बुवाबाजी करून संत म्हणवू घेणार्‍यांवर परखड ताशेरे ओढले. बुलडाण्याचे दीपक महाराज साबळे यांनी राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी पोहचविण्यासठी असे कार्यक्रम गावागावांत घेतल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.