शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला चालना देण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकविलेला सेंद्रीय व आहारमूल्य ...

अकोला : ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकविलेला सेंद्रीय व आहारमूल्य असलेला भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार असून, परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला अधिकाधिक चालना देण्याची गरज आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे निर्मित जिल्हास्तरीय पोषण परसबागेला भेट दिली असता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक गजानन महल्ले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुरज गोहाड, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ ‍कीर्ती देशमुख उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांनी परसबागेचे महत्त्व समजावून सांगितले.

कोरोनाकाळातही जिल्ह्यात

४१०० परसबागांची निर्मिती !

जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी ४१०० परस बागांची निर्मिती केली आहे. उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत आहार पोषण व स्वच्छताविषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, ६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकवलेला ताजा भाजीपाला व फळे इत्यादींचा समावेश व्हावा याकरिता उमेद अभियान प्रयत्न करत आहे.

......................फोटो.............