शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीची पद्धत बदलण्याची गरज

By admin | Updated: August 11, 2015 22:52 IST

ब्रिटिशकालीन पद्धतीचाच अवलंब ; शेतक-यांवर होतोय अन्याय.

अकोला : शेतजमिनीपासून मिळणार्‍या महसुली उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी आजही ब्रिटिशकालीन पैसेवारीची पद्धतच अवलंबली जात आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाद्वारा वेळोवेळी तज्ज्ञांच्या समिती गठित करण्यात आल्यात; परंतु दोन समितींच्या शिफारशी व काही सूचना वगळता यामध्ये फारसा बदल झालेला नाही. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पैसेवारी काढण्याच्या ब्रिटिशकालीन पद्धतीवर आक्षेप घेत आवश्यक ते बदल करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. अकोला जिल्हा दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पैसेवारीच्या पद्धतीत बदल करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले होते. राज्यातील जमिनीची विविध प्रतवारी आहे. अलीकडच्या काळात निसर्गदेखील साथ देत नाही. पाऊस लहरी झालेला आहे. याचा विपरीत परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होत आहे. सतत तीन वर्षांपासून नापिकी असताना गत हंगामातच जिल्ह्यातील पैसेवारी ५0 पैशांच्या आत नोंदविली गेली. नापिकी आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यात पैसेवारी कमी आल्याने शासनाला दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून उपाययोजना कराव्या लागल्या होता. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील नियमानुसार शासन दरवर्षी खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढते. पिकांची पैसेवारी ५0 पैसे व अवर्षणप्रवण क्षेत्रात ६0 पैशापेक्षा कमी असेल तेथे दुष्काळ जाहीर केला जातो. सध्या अस्तित्वात असणार्‍या पैसेवारी काढण्याच्या पद्धतीमध्ये १९८९ मध्ये भाई भगवंतराव गायकवाड यांच्या समितीने केलेल्या अनेक शिफारशींचा समावेश आहे. यानंतर आघाडी सरकारचे महसूल मंत्री नारायण राणे समितीने केलेल्या दोन शिफारशींचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर गठित होणार्‍या तज्ज्ञांच्या समितीमध्ये निसर्ग बदल विषयाच्या अभ्यासकांचाही समावेश झाल्यास परिस्थितीनुसार वास्तव पैसेवारी जाहीर करण्यास मदत होईल.

*जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या

         जिल्हय़ातील हवामानात बदल, पाऊस याचा पिकांवर होणारा परिणाम यासाठी जिल्हा हवामान निरीक्षण गट ही जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. दुसरी समिती ही पीक पैसेवारी जिल्हा देखरेख समिती असून, त्याचे अध्यक्षसुद्धा जिल्हाधिकारी असतात. यामध्ये कृषी, सहकार विभाग व बँकेचे अधिकारी असतात.

*नजरअंदाज पैसेवारी

       शेतीपिकांची स्थिती काय आहे, याचे अनुमान घेण्यासाठी महसूल विभागाद्वारा नजरेच्या अंदाजाने हंगामी पैसेवारी काढण्यात येते. यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीत बदल झाल्यास सुधारित हंगामी नजरअंदाज पैसेवारी काढणे महसूल विभागाला बंधनकारक आहे.

*पैसेवारी घोषित करण्याच्या तारखा

हंगामी पैसेवारी - ३0 सप्टेंबर

सुधारित हंगामी पैसेवारी - १५ नोव्हेंबर

अंतिम पैसेवारी - १५ जानेवारी

रब्बी हंगामी पैसेवारी - १५ जानेवारी

सुधारित हंगामी पैसेवारी - १५ फेब्रुवारी

अंतिम पैसेवारी - १५ मार्च