शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बुडित बँक-पतसंस्थांमधील रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे संघटन गरजेचे - विश्वास उटगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 20:39 IST

बुडित बँका आणि पतसंस्थेतून जर हक्काचा पैसा काढायचा असेल तर ठेविदारांना संघटन करून न्यायालयात दाद मागावी लागेल.

- संजय खांडेकरअकोला : भविष्याची शिदोरी म्हणून पोटाला चिमटा देत आयुष्याची संपूर्ण कमाई अनेकजण बँक -पतसंस्थेत ठेवी म्हणून ठेवतात. पण बेजबाबदार संचालक आणि बँक अधिकारी लायकी नसलेल्यांना कर्ज देऊन बँका बुडवितात. असल्या वाढत्या प्रकारामुळे सामान्य माणसांचा बँकांवरील विश्वास धूसर होत चालला आहे. बुडित बँका आणि पतसंस्थेतून जर हक्काचा पैसा काढायचा असेल तर ठेविदारांना संघटन करून न्यायालयात दाद मागावी लागेल. त्यासाठी काय करावे याची माहिती बँक आणि कामगार संघटनेचे नेते विश्वास उटगी यांनी दिली. गुरूवारी ते अकोल्यात येऊन गेले, यादरम्यान त्यांच्या लोकमतने साधलेला संवाद.प्रश्न : डबघाईस आलेल्या बँका आणि पतसंस्थामध्ये अडकलेली रक्कम कशी निघेल?उत्तर : बुडीत बँका-पतसंस्थांमधील रक्कम काढण्यासाठी ठेविदारांमध्ये जागृती आणण्यासाठीच मी विदर्भात आलो.अकोला आणि शेगाव येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप सोसायटी ठेविदारांनी मला येथे पाचारण केले आहे. ठेवीदारांना संघटित केल्याशिवाय ठेवीदारांच्या रकमेला शंभर टक्के सुरक्षा मिळणार नाही असे रिझर्व बँक आॅफ इंडिया आणि भारत सरकारचे धोरण आहे. रिजर्व बँकेच्या धोरणानुसार एमपीआयडी न्यायालयात दाद मागण्यासाठी ठेवीदारांचे संघटन उभारणे गरजेचे आहे.प्रश्न : ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप सोसायटीच्या ठेविदारांना आपण काय सल्ला दिला?उत्तर : अकोला-शेगाव येथील ठेविदारांची बैठक मी घेतली. २ वर्षांपूर्वी डबघाईस आलेल्या ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप सोसायटीच्या ठेविदारांचे कोट्यवधी रूपये पडून आहे. संचालकमंडळांविरूध्द कारवाई सुरू असली तरी ठेविदारांची हक्काची रक्कम गोठली गेली आहे. प्रशासक नियुक्त असलेल्या या सोसायटीच्या कर्जदारांकडून ४५ कोटींची वसुली सुरू आहे. ही मोहिम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. ठेविदारांनी एकसंघ होऊन न्यायीक लढा उभारावा, अन्यथा रक्कम मिळणे नाही. असा सल्ला येथील ठेविदारांना देण्यात आला.प्रश्न : शिखर बँकेच्या संचालकांवरील ईडीची कारवाई ऐन निवडणुकीच्या वेळी योग्य आहे का ?उत्तर : शिखर बँकेवरील ईडीची आताचं झालेली कारवाई म्हणजे घाणेरडे राजकारण होय. ज्यांचा संचालक म्हणून उल्लेखही नाही त्यांना देखिल गोवण्याचा प्रयत्न होत आहे. याचे उत्तर नागरिकांना केवळ बॅलेट पेपरच्या माध्यमातून माध्यमातूनच दिले जाऊ शकते.प्रश्न : पीएमसीवर झालेल्या कारवाईबाबत आपणास काय वाटते?उत्तर : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक ही राज्यात नव्हे तर देशात नामवंत आहे. एचडीआयएल पितापुत्रांना दिलेल्या २५०० कोटींंच्या कर्जामुळे या बँकेवर ही वेळ आली. संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे बँकेवर प्रशासकाची नेमणूक झाली. १९ पूर्वीच्या आॅडिटमध्येच ही बाब स्पष्ट व्हायला हवी होती. यामुळे जनतेची कोंडी झाली आहे.प्रश्न : बॅक विलिनीकरणामुळे काय साध्य होणार आहे?उत्तर : केंद्र सरकारने सध्या बँक विलिनिकरणावर विशेष जोर दिलेला आहे. देशातील बँक विलीन झाल्या तर मोठे कर्ज बुडवे आहेत त्यांना लाभ होणार आहे. सरकारचा हा छुपा अजेंडा अजूनही अनेकांना समजलेला नाही. बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी बँक विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँकinterviewमुलाखत